Jeevanvidya Discussion Forums
February 04, 2012, 09:37:03 AM *
Welcome, Guest. Please login or register.

Login with username, password and session length
News: Note: New user registration is Enable till 15 Aug 2011
 
  Back to Website   Home   Help Search Login Register  
Pages: 1 [2]   Go Down
  Print  
Author Topic: Eabhhyasvarg -Namacha Nandadeep  (Read 6690 times)
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 308


« Reply #15 on: February 25, 2007, 08:44:19 PM »

समाजात ७०% माणसे ही संसारी तर २६% माणसे ही देव-देवतांच्या (शक्ती-उपासना) प्राप्तीसाठी झटणारी व फक्त ४% माणसे ही निखळ अध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करणारी असतात असे म्हटले जाते.  सद्‌गुरू 'विचारवंत' हा शब्द वापरतात ते विचारवंत या ४% मधून तयार होत असतात.  हे ४% प्रमाण जेव्हा घसरते तेव्हा विचारांचे प्रदूषण वाढीस लागते.  ह्या टक्केवारीच्या आधारावर वेदांच्या ऋचांची संख्या आधारलेली आहे असे मानले जाते.

वेदांमधे एकूण १,००,००० ऋचा आहेत.  त्यातील ७०,००० ऋचांमधून सांसारिक अडीअडचणींवर मात करण्यासाठीचे उपाय दिलेले आहेत.  २६,००० ऋचांमधून देव-देवता प्रसन्न करून घेण्याबद्दलचे मार्गदर्शन आहे.  तर फक्त ४,००० ऋचा अध्यात्मिक प्रगती साध्य व्हावी यासाठी रचल्या गेल्या आहेत.  या ४,००० ऋचांनाच उपनिषद असे म्हणतात.

मराठी भाषिकांना या उपनिषदांमधील जास्त माहित असलेला भाग म्हणजे गणपती अथर्वशिर्ष होय.  याचे कारण म्हणजे लोकमान्य टिळकांनी प्रोत्साहन दिल्यामुळे महाराष्ट्रात मोढ्या प्रमाणावर साजरा होणारा सार्वजनिक गणेशोत्सव होय.  असो.

वरील माहितीच्या आधारे आपण नवसे शिष्यांबद्दल विचार करावयाचा प्रयत्न करू.

१) असे शिष्य संसारी असतात.
२) साधारणत: एकूण शिष्य संप्रदायात नवसे शिष्यांचे प्रमाण हे सर्वात जास्त असते.
३) असे शिष्य हे व्यवहारी असण्याचीही शक्यता  जास्त असते.
४) या शिष्यांमधे एक चांगला गुण असतो तो म्हणजे काहितरी मिळविण्यासाठी काहीतरी देण्याची त्यांची तयारी असते.  त्यांच्यातील याच गुणांचा दुरूपयोग करून ढोंगी गुरू पैसे कमावतात.
५) याउलट खरे सद्‌गुरू नवसे शिष्यांचा ह्या चांगल्या गुणांचा उपयोग अशा शिष्याची उन्नती करण्यासाठी करतात.  सद्‌गुरूंना अशा शिष्यांकडून काहीही मिळवावयाचे नसते.  म्हणून खरे सद्‌गुरू अशा शिष्यांना काहितरी मिळविण्यासाठी कष्ट करायला प्रवृत्त करतात.
६) अशा शिष्याने मनात बाळगलेले इप्सीत योग्य नसल्यास सद्‌गुरू त्याचेकडे दुर्लक्ष करतात.  अर्थातच आपले काम येथे होणार नाही असे समजून असे नवसे शिष्य सद्‌गुरूंना सोडून जातात.
७)  मात्र अशा शिष्यांनी मनात बाळगलेली इच्छा योग्य असल्यास सद्‌गुरू त्यांना योग्य मार्गदर्शन करून योग्य ती साधना करायला प्रवृत्त करतात.  जर त्यांनी त्याप्रमाणे साधना केली तर या साधनेच्या जोरावर अशा शिष्यांचे मनोवाच्छित पूर्ण होते व त्यांची श्रध्दा वाढून ते सद्‌गुरूंपाशी स्थिरावतात.  जर मनोवाच्छित पूर्ण झाल्यावरही अशा शिष्यांनी त्यांच्या साधनेचा जोर पूर्वीसारखाच कायम ठेवला तर त्यांची ही वाढलेली श्रध्दा त्यांच्या साधनेचा दर्जा वाढवून लवकरच अशा शिष्यांची गणना वसे शिष्यांत होऊ लागते.
८) नवसे शिष्यांतील काही शिष्य मूळचे प्रामाणिक, सज्जन व मनापासून कष्ट करणारे असतात पण 'माणसाने विचार करून विचार करायला शिकले पाहिजे' हा जीवनविद्येचा सिध्दांत माहित नसल्यामुळे त्यांचेकडून अशुभ चिंतन होत जाऊन या संसारातील अडीअडचणीच्या गर्तेत ते फसतात. (या प्रकारच्या माणसांचे सुरेख वर्णन व स्पष्टीकरण सद्‌गुरूंनी 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' या ग्रंथात पान क्र.१५३-१५४ वर केले आहे.)  जर कर्मधर्म संयोगाने अशा माणसांना खरे सद्‌गुरू लाभले तर अशी माणसे 'नवसे' बनून येतात.  त्यांनाही वरच्या प्रमाणेच (क्रमांक ७) अनुभव येतो.  मात्र सज्जनपणा व प्रामाणिकपणा व मनापासून कष्ट करण्याची तयारी यांची जास्तीची जोड मिळाल्याने हे लोक नुसते वसे शिष्य बनत नाहीत तर चांगले अधिकारी साधक बनण्यापर्यंत यांची तयारी होते.
९) या सज्जन व प्रामाणिक नवसे शिष्यांवर सद्‌गुरूंचे बारीक लक्ष असते व असे शिष्य जेव्हा वसे शिष्यांत रुपांतरीत होतात तेव्हा सद्‌गुरू त्यांचेवर प्रेमही करू लागतात.
१०) साधारणत: नवसे शिष्यांमधूनच सर्वात जास्त वसे शिष्य सद्‌गुरूंना मिळतात.
११) प्रारंभापासून वसे शिष्य म्हणून सद्‌गुरूंकडे येणारे अत्यल्प असतात व असे शिष्य हे सत्शिष्य म्हणून ओळखले जातात.  अशा शिष्यांची पूर्वजन्मी नक्कीच खूप मोठी साधना झालेली असते.
आता 'शिष्यांचे प्रकार' हे प्रकरण सद्‌गुरूंनी का लिहिले असावे असे मला वाटते त्याबाबत

आपण सद्‌गुरू सेवा करत असताना काहीवेळा आपण अत्यंत आनंदात असतो.   साधना करण्यात तसेच  सेवा करण्यात विलक्षण आनंद मिळत असतो तेव्हा आपण वसे शिष्य असतो.

काही वेळेस सद्‌गुरू सेवा करताना आपण चेष्टा-मस्करीत (टिंगल-टवाळी नव्हे) सामील होतो तेव्हा आपण हसे शिष्यांत सामील होतो.

काही वेळेस आपण झपाटल्यासारखे काम करतो.  इतरजण तसे बोलूनही दाखवतात पण कामा व्यतिरिक्त आपले कशातही लक्ष नसते.  अशावेळेस आपण पिसे शिष्य असतो.

बऱ्याच वेळेस आपल्यावर अडचणीचे प्रसंग उद्‌भवतात तेव्हा आपण ती अडचण सद्‌गुरूंना सांगतो किंवा मी साधना करत आहे तेव्हा भिण्याचे कारण नाही.  आपल्याला सद्‌गुरू यातून नक्की सोडवतील असा आपल्या मनाला धीर देतो तेव्हा आपण नवसे शिष्य बनत असतो.

काही वेळेस आपल्याला काम करावयाचा खूप कंटाळा येतो.  आपले काम सुध्दा कोणाला तरी दुसऱ्याला करायची विनंती करतो.  इतरवेळेस आपण नेहमीच काम करत असल्यामुळे आपली विनंती मान्यही केली जाते.  यावेळेस आपण बसे शिष्य असतो.

तर कित्येक वेळेस सेवा करत असताना इतरांबरोबर थोडासा वाद होऊन आपली थोडीशी चिडचिड होते तेव्हा आपण रुसे शिष्य बनत असतो.

ही उदाहरणे वानगीदाखल दिली आहेत.  यातून मला हे सुचवावयाचे आहे की, सर्व शिष्यांना स्वत:ची तपासणी स्वत: (self test)  करता यावी हा उद्देश हे प्रकरण लिहिण्यामागे सद्‌गुरूंचा असावा.

इतकेच नव्हे तर आपल्या दैनंदिन जीवनात देखील ह्या पध्दतीने आपल्याला आपली तपासणी करता येईल असे वाटते. 

सर्वांना नमस्कार, सर्वांना शुभेच्छा.

(samajat 70% manase hi sansari tar 26% manase hi dev-daivatanchy (shakti-upasana) praptisathi jhatanari v 4% manase hi nikhal adyatmik unnatisathi prayatn karanari asatat ase mhatale jate.  sadguru 'vicharvant' ha shabd vapartat te vicharvant ya 4% madhun tayar hot asatat.  he 4% praman jevha ghasarate tevha vicharanche pradushan vadhis lagate.  hya takkevarichy aadharavar vedanchy ruchanchi sankhya aadharleli aahe ase manale jate.

vedanmadhe ekun 1,00,000 rucha aahet.  tyatil 70,000 ruchanmadhun sansarik adiadchaninvar mat karanyasathiche upay dile ahet.  26,000 ruchanmadhun dev-devata prasanna karun ghenyabaddalche margdarshan aahe.  tar phakt 4,000 rucha adyatmik pragati sadhy vhavi yasathi rachalya gelya aahet.  ya 4,000 ruchanna upnishad ase mhanatat.

marathi bhashikanna ya upnishadanmadhil jast mahit asalela bhag mhanaje ganapati atharvshirsha hoy.  yache karan mhanaje lokmanya tilakanni protsahan dilyamule mothya pramanavar sajara honara sarvjanik ganeshotsav hoy.  aso.

varil mahitichya aadhare aapan navase shishyanbaddal vichar karavayacha prayatn karu.

1) ase shishy sansari asatat.
2) sadharant: ekun shishy sampradayat navase shishyanche praman he sarvat jast asate.
3) ase shishy he vyavahari asanyachi shakyata jast asate.
4) ya shinshyanmadhe ek changala gun asato to mhanaje kahitari milavanyasathi kahitari denyachi tyanchi tayari asate.  tyanchyatil  yach gunancha durupyog karoon thongi guru paise kamavatat.
5) yaulat khare sadguru navase shishyancha hya changalya gunancha upayog asha shishyanchi unnati karanyasathi karatat.  sadgurunna asha shishyankadun kahi milavavyache nasate.  mhanun khare sadguru asha shishyanna kahitari milavnyasathi kasht karayala pravrut karatat.
6) asha shishyane manat balagalele ipsit yogya nasalyas sadguru tyachekade durlaksh karatat.  arthatach aapale kam yethe honar nahi ase samajun ase navase shishy sadgurunna sodun jatat.
7) matra asha shishyanni manat balagaleli ichcha yogya asalyas sadguru tyanna yogya margdarshan karun yogy ti sadhana karayala pravrutta karatat.  jar tyanni tyapramane sadhana keli tar tya sadhanechy joravar asha shishyanche manovanchchit purna hote v tyanchi shradhda vadhun te sadgurunpashi sthiravatat.  jar manovanchchit purna jhalyavarahi asha shishyanni tyanchya sadhanecha jor purvisarakhach kayam thevala tar tyanchi hi vadhaleli shradhda tyanchya sadhanecha darja vadhavun lavakarach asha shishyanchi ganana vase shishyat hou lagate.
Cool navse shishyatil kahi shishy mulache pramanik, sajjan v manapasun kasht karanare asatat.  pan 'manasane vichar karun vichar karayala shikale pahije' ha jeevanvidhyecha sidhdhant mahit nasalyamule tyanchekadun ashubh chintan hot jaun ya sansaratil adiadchanichya gartet phasatat. (ya prakarachya manasanche surekh varnan v spashtikaran sadgurunni 'tuch aahes tujhya jeevanacha shilpkar' ya granthat pan kramank 153-154 var kele aahe.)  jar karm-dharm sanyogane asha manasanna khare sadguru labhale tar ashi manase 'navase' banun yetat.  tyannahi varachya pramanech (kramank 7) anubhav yeto.  matra sajjanpana, pramanikpana v manapasun kasht karavayachi tayari yanchi jastichi jod milalyane he lok nusate vase shishy banat nahit tar changale adhikari sadhak bananyaparyant yanchi tayari hote.
9) ya sajjan v pramanik shishyanvar sadgurunche barik laksh asate v ase shishya jevha vase shishyat rupantari hotat tevha sadguru tyanchevar premahi karu lagatat.
10) sadharant: navase shishyanmadhunach sarvat jast vase shishy sadgurunna milatat
11) praranbhapasun vase shishya mhanun sadgurunkade yenare atyalp asatat v ase shishy he satshishya mhanun olakhale jatat.  asha shishyanchi purvjanmi nakkich khup mothi sadhana jhaleli asate.
aata 'shishyanche prakar' he prakaran sadgurunni ka lihile asave ase mala vatate tyababat

aapan sadguru seva karat asatana kahivela aapan atyanat aanandat asato.  sadhana karanyat tasech seva karanyat vilakshan aanand milat asato tevha aapan vase shishy asato.

kahi veles sadguru seva karatana aapan cheshta-maskarit (tingal-tavali navhe) samil hoto tevha aapan hase shishya hoto.

kahi veles aapan jhapatalyasarakhe kam karato.  itarjan tase bolunahi dakhavatat pan kamavyatirikta aapale kashatahi laksh nasate.  asha veles aapan pise shishy asato.

baryach veles aaplyavar adachaniche prasang udbhavatat tevha aapan ti adachan sadgurunna sangato kinva mi sadhana karat aahe tevha bhinyache karan nahi.  aapalyala sadguru yatun nakki sodavatil asa aapalya manala dhir deto tevha aapan navase shishy banat asato.

kahi veles aapalyala kam karavayacha khup kantala yeto.  aapale kam sudhdha konala tari dusaryala karayachi vinanti karato.  itar veles aapan nehamich kam karat asalyamule aapali vinanti manyahi keli jate.  yaveles aapan base shishy asato.

tar kityek veles seva karat asatana itaranbarobar thodasa vad houn aapali thodi chidchid hote tevha aapan ruse shishy banat asato

hi vanagi dakhal udaharane dile aahet.  yatun mala he suchavavayache aahe ki, sarv shishyanna swat:chi tapasani swat: (self test) karata yavi ha uddesh he prakaran lihinyamage sadgurncha asava.

itakech navhe tar aapalya dainandin jivanat dekhil hya padhdatini aapalyala aapali tapasani karata yeil ase vatate.

sarvanna namaskar, sarvanna shubhechcha.)
« Last Edit: February 26, 2007, 12:12:43 AM by shambhagwat » Report to moderator   Logged
Varsha
Senior Contributor
***
Offline Offline

Posts: 116


« Reply #16 on: February 28, 2007, 02:35:04 AM »


Quote
प्रश्न क्र. २ नाम म्हणजे काय? नाम घेतल्याने कसा लाभ होतो?

Ans:

Devala dilele nav mhanje NAM.Dev mhanje DIVYA.Harinam he sthul drushtine ek dhvani aahe,sukshma drushtine to ek divya vichar aahe,aani ati sukshma drushtine pahata te ek tatva aahe.

Harinamachya uchharane vatavarnat shuddh lahari nirman hotat.Ya divya vichar lahari astat karan tya namacha arth Divya aasto.

Namasmaranache Fayde haripathat sangitlyapramane-

1.Sharirik va Manasik rog dur hotat.
2.Sankate nahishi hotat.
3.Sukh samadhan prapt hote.
4.aganit punyachi prapti hote.
5.pratyaksh parmeshvar namasmaran karnaryana anukul hoto.
6.charahi mukti prapt hotoat.

Pan he nam Sadguruni margadarshan kelyapramane ghetle pahije karan samanya lokana kalalela NAMACHA ARTH aani Santana kalalela NAMACHA ARTH vegla asto.

He Uttar mi NAM aani HARIPATH ya pathatun ghetle aahe.

Yaat mala na kalalela bhag mhanje 'char mukti kontya?'
Report to moderator   Logged
Geeta Datar
Junior Contributor
**
Offline Offline

Gender: Female
Posts: 75


« Reply #17 on: February 28, 2007, 09:08:30 AM »



Yaat mala na kalalela bhag mhanje 'char mukti kontya?'

[/quote]

Dear Varsha

Sadguru has explained the meaning of char mukti in DNYANESHANCHA SANDESH PAGE 42 and 43.

Bless all with akhand vishwaprarthana.

Geeta Datar
Report to moderator   Logged

Vitthal Vitthal
Geeta Datar
Junior Contributor
**
Offline Offline

Gender: Female
Posts: 75


« Reply #18 on: February 28, 2007, 09:28:16 AM »

My ans to Q 2

AS Varsha said naam appears to be just a name but in reality it is a divine thought and as one progresses in sadhana one experiences that naam and naami are the same.

Naam is a great invention by saints. Sant Nilobarai says, " Sant ekanti baisale, sarvahi siddhant shodhile, dnyandristi avalokile, saar kadhile nivadoni, TE he shrihariche naam sarva patka kari bhasma, adhikari uttam athava adham chari varna nara nari.

With lot of contemplation saints came to the conclusion that if one consistently chants shrihari naam all his past history of wrong doings will be cleared and wiil ultimately transform the person into self realised dnyni.

Bless all with Akhand naamsmaran

Geeta Datar
Report to moderator   Logged

Vitthal Vitthal
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 308


« Reply #19 on: February 28, 2007, 11:49:02 AM »

प्रश्न:- नाम म्हणजे काय?

उत्तर:- इतर शब्द वासनेतून स्फुरतात व देहबुध्दीच्या स्पर्शाने विकृत होऊन विषयांच्या अपेक्षेत आकाशाच्या माध्यमातून आकाराला येतात.  याउलट भगवन्नाम हे चैतन्याचे शुध्द स्फुरण आहे.  भगवंताच्या शुध्द स्मरणाने स्वस्वरुपात जे स्फुरण होते ते शुध्द स्फुरण जसेच्या तसे चिदाकाशातून चित्ताकाशात उतरते व चित्ताकाशातून भूताकाशात अवतीर्ण होऊन नामरुपाने साकार होते.  अशा या भगवन्नामाचे स्वरूप असते ब्रह्म व रूप असते नाम. नामाचा नंदादीप पान क्र. २६

१) वरील उत्तरात 'देहबुध्दीच्या स्पर्शाने विकृत होऊन' या सद्‌गुरूंनी केलेल्या शब्दप्रयोगाला अतिशय महत्व आहे असे मला वाटते.  त्याबाबत चर्चा करण्यासाठी मी माझे मुद्दे मांडत आहे.

संगणकावर आपण माहिती साठवतो. ह्या माहितीच्या प्रत्येक समुच्चयाला आपण फाईल (file) असे म्हणतो.  अशा प्रकारच्या अनेक फाईल्स आपण संगणकावर साठवत असतो.  ह्यातील प्रत्येक फाईल वेगवेगळी ओळखता यावी यासाठी त्या प्रत्येक फाईलला नाव देतो.  त्याचप्रमाणे नाम म्हणजे आपल्या अंतर्मनात साठवलेल्या माहितीच्या साठ्यातील काही भागाला दिलेले नाव असते असे म्हणता येईल.  ह्या नावाची बहिर्मनाला आठवण झाली की अंतर्मन त्या नावाच्या संदर्भातील माहिती बहिर्मनाला उपलब्ध करून देते. ही माहिती चांगली आहे किंवा वाईट आहे याचे काही एक सोयर-सुतक संगणकाला/अंतर्मनाला नसते.  नाव आणि नाम हे यादृष्टीने पाहिल्यास समानार्थी शब्दच मानले पाहिजेत.

तरीही त्यात फरक आहे.  तो लक्षात घेण्यासाठी अंतर्मनातील ही माहिती कशा स्वरुपाची असते हे लक्षात घ्यावे लागेल.  समजा एखादी घटना घडत आहे व त्याची नोंद अंतर्मन करत आहे अशी कल्पना करू.  अशावेळेस प्रत्यक्ष वस्तुस्थितीची नोंद अंतर्मन करतेच पण त्याच बरोबर आपल्या देहबुध्दीद्वारे निर्माण होणारे त्या वस्तुस्थितीबद्दलचे भाव, भावना, कल्पना, विकार तसेच त्यांचे आवेग किंवा जोर (intencity) तसेच ही माहिती यापूर्वी बहिर्मनाने कितीवेळा मागितली (उजळणी) यावरून त्या माहितीचे महत्व वगैरे अनेक प्रकारचे तपशील अंतर्मन साठवत असते.  (जागेपणी ही सर्व माहिती कच्या स्वरुपात व गाढ झोपेत या माहितीचे विश्लेषण,वर्गीकरण करून ती माहिती पक्या स्वरुपात साठवली जाते.)  खऱ्या वस्तुस्थितीवर देहबुध्दीद्वारे झालेल्या या जास्तीच्या संस्कारामुळे अंतर्मनाकडून खरी वस्तुस्थिती नोंदवली जाण्याऐवजी प्रदूषित अथवा भेसळ झालेली वस्तूस्थिती नोंदवली जाते.  याचा परिणाम असा होतो की घडलेली घटना एकच असते पण त्या घटनेचे साक्षीदार असलेल्यांच्या अंतर्मनात त्या घटनेची नोंद मात्र वेगवेगळ्या प्रकारे केली जाते.  या अर्थाने प्रत्येकाचे जग वेगळे असते असे म्हटले जाते.  दिव्यबुध्दी प्राप्त झालेल्या संतांच्या बाबतीत मात्र देहबुध्दी लोप पावलेली असल्यामुळे खऱ्या वस्तुस्थितीमधे काहीही भेसळ न होता त्याची नोंद अंतर्मन करत असते हे इथे लक्षात ठेवले पाहिजे.  यामुळेच संतवचनांचे अर्थ नित्य अथवा स्थळ,काळ निरपेक्ष असतात असे म्हणता येते.

नाव किंवा नाम हे शेवटी शब्दच असतात.  आपले जग या शब्दांनीच भरलेले असते.  प्रत्येक शब्दागणिक त्या शब्दाच्या खऱ्या अर्थाबाबत अंतर्मनाने काही माहिती साठवून ठेवलेली असते.  यालाच सद्‌गुरूंनी 'शुध्द स्मरण' ही संज्ञा वापरलेली आहे.  मात्र अशी माहिती साठवून ठेवली जात असताना त्यात प्रत्येक वेळेस आपल्या नकळत आपल्या देहबुध्दीने काही भर घातली जाऊन अशी भेसळयुक्त नोंद प्रत्येक शब्दाची अंतर्मनाने केलेली असते.  याला 'अशुध्द स्मरण' असेही म्हणता येईल.  जेव्हा आपल्या मनात एखादा शब्द येतो तेव्हा त्या शब्दाच्या संदर्भात साठवलेली अशी भेसळयुक्त माहिती अंतर्मन बहिर्मनाला उपलब्ध करून देत असते.  म्हणूनच प्रत्येक शब्दागणिक अशी भेसळयुक्त माहिती साठवली जाऊ नये यासाठी विचारांवर जागृत राहून लक्ष ठेवण्याची कला प्राप्त करण्याबाबत सद्‌गुरू आवर्जून सांगत असतात.  वेगळ्या शब्दात सांगावयाचे झाल्यास साधनेद्वारे जसजशी आपली देहबुध्दी कमी कमी होत जाते त्याप्रमाणात आपोआपच ह्या भेसळीचे प्रमाण कमी कमी होत जाऊन सरतेशेवटी पूर्णपणे भेसळमुक्त अशी माहिती साठविण्याची कला आपल्याला प्राप्त होते.  आत्मसाक्षात्कार ही घटना नसून प्रक्रिया आहे असे त्यासाठीच म्हटले जाते. 

वासना म्हणजे इच्छा.  मात्र ही इच्छा देहबुध्दीच्या मुळे निर्माण होणाऱ्या आसक्तीतून (मी व माझे)  निर्माण झाली तर त्या इच्छेला वासना असे म्हणतात.  वासनेतून जेव्हा शब्द स्फुरतात तेव्हां अंतर्मन त्या शब्दासंदर्भात साठवलेली माहिती बहिर्मनाला उपलब्ध करून देते.  या माहितीमधे देहबुध्दीद्वारे भर घातलेली माहिती सुध्दा सामील झालेली असल्यामुळे त्या शब्दांचे अर्थ विकृत होतात.  हे सर्व स्पष्ट करण्यासाठी 'देहबुध्दीच्या स्पर्शाने विकृत होऊन' या शब्दप्रयोगांची योजना सद्‌गुरूंनी केली असावी असे वाटते. 

या सगळ्या विवेचनावरून हे स्पष्ट होऊ शकेल की, प्रत्येक शब्दागणिक आपल्या अंतर्मनात केल्या जाणाऱ्या प्रत्येक नोंदीवर आपली देहबुध्दी, त्यातून निर्माण होणारा अहंकार व त्यातून निर्माण होणारे काम,क्रोध,लोभ,मोह,मद व मत्सर ह्या षडरिपूंचे संस्कार होत असतात.  म्हणूनच प्रत्येक शब्द हे भगवत्नाम होऊ शकत नाही.

२) याउलट भगवत्नाम हे चैतन्याच्या शुध्द स्फुरणातून  येते.  म्हणजेच भगवत्नाम हे देहबुध्दीशी जडलेले नसते असेही म्हणता येईल.  या भगवत्नामाचा अर्थ अंतर्मनात नोंदवला जात असताना त्या अर्थामधे देहबुध्दीद्वारे जास्तीची भर टाकली जात नाही.  त्यामुळे भगवत्नामाबद्दल अंतर्मनात साठविलेल्या माहितीमधे कुठल्याही प्रकारची भेसळ असत नाही.  दुसऱ्या शब्दात सांगावयाचे झाल्यास भगवत्नामाबद्दल साठविलेली माहिती जेव्हा अंतर्मन बहिर्मनाला उपलब्ध करून देते त्यावेळेस त्या माहितीमधे अजिबात भेसळ नसते असे म्हणता येईल.  याचाच परिणाम म्हणून भगवत्नामाला देहबुध्दीच्या स्पर्शाने विकृत होण्याचा धोकाही संभवत  नाही.  हाच मुद्दा स्पष्ट करण्यासाठी सद्‌गुरूंनी त्यांनी दिलेल्या उत्तरात 'जसेच्या तसे' हा शब्दप्रयोग केला आहे असे वाटते.

३) 'जसेच्या तसे' ह्या शब्दांचे महत्व जर लक्षात आले तरच नामस्मरण त्वरित फलदायी होण्याची शक्यता वाढेल असे वाटते. 

जेव्हा एखादा माणूस सकाम नामस्मरण करत असेल तर त्या भगवत्नामाबरोबर अंतर्मनात साठविल्या जाणाऱ्या माहिती बरोबरच त्या साधकाची कामना व त्यासंबंधीचे विचार वगैरेही साठवले जातात व त्या प्रमाणात भगवत्नामाचा खरा अर्थ विकृत होतो.  वेगळ्या शब्दात सांगावयाचे झाल्यास भगवत्नामाबद्दल आपल्या अंतर्मनात साठविली जाणारी माहिती ही अतिशय शुध्द स्वरूपाची राहील याची जबाबदारी आपली आहे.  त्यासाठीच भगवत्नाम घेताना शुचिर्भूतता किंवा अन्य नियम पाळावयाचे असतात.  मात्र हे भान विसरले तर मात्र मनुष्य सोवळे-ओवळे इत्यादि कर्मकांडात अडकून फक्त कवायती करू लागतो.  निरनिराळी स्तोत्रे, आरत्या, पूजापाठ, पारायणे इत्यादिंचा हा मूलभूत हेतू आहे की, भगवंताविषयी अंतर्मनात साठविलेली माहिती ही अत्यंत शुध्द स्वरूपात राहिल जेणे करून भगवत्नाम जसेच्या तसे भूताकाशात नामरूपाने साकार होईल.

जीवनविद्येच्या सभासदांनी भगवत्नामासंबंधी आपल्या अंतर्मनात कोणते विचार साठवावयाचे आहेत यासंबंधी सद्‌गुरूंनी 'अमृत मंथन' या ग्रंथात पान क्र.६० वर सुरेख स्पष्टीकरण केले आहे.  "देव म्हणजे सर्व सुखाचे आगर आहे, दिव्य आनंदाचा सागर आहे, दिव्य ज्ञानाचे कोठार आहे, ऐश्वर्याचे केंद्र आहे, सर्व शक्तिमान, सर्वव्यापी व दयाधन आहे."  अशा त्या भगवंताचे नाम मी घेत आहे हे सतत ठसवत राहिल्यास सद्‌गुरूंनी भगवत्नामाबद्दल केलेल्या व्याख्येनुसार भगवत्नामाचे अनुभव आपल्याला आल्याशिवाय राहाणार नाही असे वाटते. 

सर्वांना नमस्कार, सर्वांना शुभेच्छा.
Report to moderator   Logged
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Female
Posts: 429



« Reply #20 on: March 06, 2007, 02:22:51 AM »

आपल्या सर्वांचे सुखनिधान आनंदनिधान विश्वसंत श्री. सदगुरू पै माऊली आणि सौ. माई यांच्या चरणी कोटी कोटी शिरसाष्टांग नमस्कार.

मला उत्तर लिहिण्यास विलंब झाला आहे त्याबद्दल क्षमस्व. आपणा सर्वांना सप्रेम अभिवादन.

वर्षाने दिलेले उत्तर अतिशय छान आहे.

नाम हा ध्वनी आहे. त्याची उत्पत्ती ओंकारातून झाली असे संत सांगतात. ओंकार हे चैतन्याचे मुळ स्फुरण आहे. तेथे दिव्य जाणीव वास करते. तेथे फक्त अस्तित्वात असण्याची जाणीव आहे. चैतन्य तत्व जेव्हा भानावर येते तेंव्हा प्रथम ते आपण अस्तित्वात असल्याचे भान घेते आणि नंतर आपण अस्तित्वात असल्याचे भान देते. हे भान देणे म्हणजेच तत्वतः चैतन्य तत्वाचे ओंकार स्फुरण आहे. नामाच्या उच्चाराबरोबर दिव्य लहरी निर्माण होतात आणि या दिव्य लहरींचे परिणाम जाणीवेवर होतात. विद्युत लहरी, प्रकाश लहरी, चुंबकीय लहरी याचप्रमाणे अल्ट्रॉसॉनिक लहरी यांचे परिणाम देखील आपणास ठाऊक आहेत. नामाच्या उच्चाराबरोबर सुक्ष्म अशा दिव्य लहरी निर्माण होतात आणि त्यांचे परिणाम आपल्या चित्तावर होत जातात. याबद्दल Deflection Theory प्रतिपादित केली गेली आहे त्यानुसार नामोच्चाराबरोबर हळूहळू आपल्या मनात devotion centre निर्माण होते. जसजसे नामस्मरण वाढत जाते तसतसे ते अधिकाधिक अधिकाधिक शक्तिशाली बनत जाते व त्यानंतर ते आपल्याला फक्त योग्य कर्मे-सत्कर्मे करण्यास प्रवृत्त करते. 
याविषयी अधिक माहिती http://www.spiritualresearchfoundation.org/spiritualresearch/happiness/gaininghappiness/happiness_reducingincorrectimpressions_d.php
या वेबपेज वर जाऊन घ्यावी.

पण  या नामाचा उगम exacyly होतो कसा? या प्रश्नाचे चिंतन केले असता आठवण येते ती श्री. जगदीश बोन्द्रे यांनी लिहिलेल्या नितांत सुंदर श्री. सदगुरू स्तवनाची. त्यांनी या स्तवनात प्रार्थना धरली कोणी? असा प्रश्न विचारला आहे? याचे उत्तर  श्री. सदगुरूंनी असे आहे. म्हणजे प्रार्थना जर श्री. सदगुरू धरतात तर उघड आहे की नाम ही श्री. सदगुरूच धरतात. नामानेच शिष्य श्री. सदगुरूंबरोबर जोडले जातात. श्री. गोंदवलेकर महाराज यांना एका साधकाने एक प्रश्न विचारला होता की एवढे लोक तुम्हाला भेटून जातात तर तुम्ही त्यांना भेटायला आल्याबरोबर कसे ओळखता? त्यावर त्यांनी असे उत्तर दिले की, जो माझा शिष्य होतो त्याच्या अंतःकरणात मी नाम कोरून ठेवतो, त्यामुळे मी त्याला बरोबर ओळखतो. आपण जेंव्हा अनुग्रह घेतो तेंव्हा श्री. सदगुरू आपल्या दिव्य संकल्पाने आपल्या ठिकाणी असणाऱ्या जाणीवेच्या अंगी नामाचे-प्रार्थनेचे स्फुरण निर्माण करतात. त्यानंतर साधकाने श्री. सदगुरूंच्या उपदेशाप्रमाणे वागून आणि नामस्मरण व प्रार्थना तसेच त्यांनी दिलेल्या इतर साधना करून, श्री. सदगुरू सेवा करून व सत्संगात राहून हे नामस्मरण आपल्या मनात सदैव जागृत ठेवायचे व वाढवायचे असते. श्री. सदगुरूंच्या अंतःकरणातूनच -चिदाकाशातूनच या नामाचा-प्रार्थनेचा उगम आहे. श्री. सदगुरूंचे अवघे चिदाकाश ब्रम्हरूप असल्याने नामही ब्रम्हरूपच आहे.  नामाच्या उच्चाराबरोबर आपल्या ठिकाणी असणारी जाणीव वरच्या दिशेने वळली जाते. ही जाणीव हळूहळू मुळ स्वरूपाकडे वळते. श्री. सदगुरूंनी अनेक ग्रंथांत सांगितले आहे की वृत्तीचा कारंजा हा मनात सतत विचार रूपाने उसळत असतो. नामाचे स्मरण यात सारखे काठी घालण्याचा प्रयत्न करते. वारंवार उसळी मारणाऱ्या मनाला नामाच्या किंवा प्रार्थनेच्या सहाय्याने वारंवार अडथळा केला असता मनाची विचार रूपाने प्रकट होण्याची सवय हळूहळू मंदावत जाते. मन जसजसे शुध्द होऊ लागते तसतसे विचारांचे प्रमाण घटते. सर्वसाधारण पणे सेकंदाला ५-६ विचार किमान येत असतात. हे प्रमाण जसजसे नामस्मरण आणि प्रार्थना वाढेल तसतसे कमी होत जाते हे प्रमाण कमी करण्यासाठी आकाश-भान ही साधना advance course मध्ये शिकवली जाते.

दिव्य बोध आणि दिव्य साधना दिल्यावर आणि ती मनापासून श्रध्देने केल्यावर विचारांचे प्रमाण जास्त वेगाने कमी होत जाते आणि मन लवकर लवकर शुध्द होत जाते पण ही साधना अंत्यंत सूक्ष्म आहे आणि मनाने श्री. सदगुरंशी पूर्णपणे शरणागती साधल्याशिवाय साधनेचे शिवधनुष्य साधकाला पेलता येत नाही.याविषयी जास्त माहिती श्री. सदगुरूंनी तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार "सदगुरू व त्यांचे दिव्य मार्गदर्शन" व अमृत मंथन -"साधनेचे रहस्य" या दोन्ही ग्रंथांतील प्रकरणात दिली आहे. तसेच जीवनविद्येचा मंगल कलश पान १०५ वर दिव्य साधनेविषयी अधिक माहिती दिली आहे.
नाम आणि नामी हे अभेद असतात. पण ते नामीच्या बाजूने आहे म्हणजे नामीच नाम रूपाने स्थूल होतो आणि प्रकट होतो. पण नाम हे चैतन्याचे स्फुरण आहे.ते चैतन्य तत्वमय आहे; तसेच मुळ स्वरूपापर्यंत पोहोचण्याचे साधन आहे पण ते म्हणजे पूर्ण परमेश्वरी तत्व त्याच्या अमर्याद व्याप्तीसह नव्हे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. जे साधक अनुग्रह न घेता नाम साधना करतात. त्यापैकी बहुतेक सगळे नामाने नामाचेच स्मरण करतात. नाम हे नामीला ठेवलेले नाव आहे पण नामाची ओळख न करून घेता जर नामस्मरण केले तर ते याच प्रकारचे होते. आंबा न चाखलेल्या माणसाने आंब्याचे स्मरण करावे तसे ते आहे. म्हणून श्री. सदगुरूंकडूनच नाम घेणे फार आवश्यक आहे. ते आपली नामीशी ओळख करून देतात व त्यानंतरच खरे नामस्मरण सुरू होते.

गीता ताईंनी नामाविषयी जे निळोबारायांचे विचार आहेत ते सांगितले आहेत. ते अगदी अर्थपूर्ण आहेत. नाम हे संतांनी लावलेला अलौकिक असा शोध आहे. नाम मंत्र जगातील जवळ जवळ सर्व धर्मातील लोक जपतात. ते अतिशय सनातन असे साधन आहे. नामाचा महिमा भागवतात मुक्तकंठाने गायला आहे.

नाम हे घेण्यास अतिशय सुलभ आहे त्यासाठी कोणतेही स्थळ-काळाचे-जातीधर्माचे-शौच-अशौच असे बंधन नाही कोणीही यावे आणि नदीवर पाणी पिऊन जावे तसे नाम हे कोणीही घेऊ शकते त्याला कोणताही खर्च नाही. कोणतेही ज्ञान असण्याची आवश्यकता नाही. नर-नारी आबाल-वृध्द सर्वांनी सर्व काळी नामामृत प्राशन करावे आणि मनुष्य जन्म सार्थक करावा असे ते आहे.ईश्वर प्राप्तीचे ते अतिशय सुलभ असे साधन आहे म्हणूनच सर्व संतानी कळवळीने तळमळीने लोकांना नाम घेता राहू नका असा उपदेश केला आहे.

नाम घेण्याचे सकाम नामस्मरण आणि निष्काम नामस्मरण असे दोन प्रकार आहेत. सकाम म्हणजे मनात कोणती तरी ईच्छा धरून ती पूर्ण होण्यासाठी केलेले नाम स्मरण. खरे म्हणजे नामस्मरण ईच्छा न धरता केले तरी अंतःकरणात-अंतर्मनात जी ईच्छा असेल ती आपोआप पूर्ण होतेच. पण तरीही सर्वसाधारण माणसाचे मन या विषयी साशंक असते. नाम-स्मरण या साधनेविषयी आणि आपली ईच्छा पूर्ण होईल की नाही याविषयी साधकाचे मन साशंक असते त्यामुळे नामस्मरण व्यवस्थितरीत्या होऊ शकत नाही.

 यासाठी श्री.गुरूं आपले जे हिताचे आहे तेच करतील आणि होऊ देतील यावर पूर्ण विश्वास असणे आवश्यक आहे याशिवाय बहिर्मनाचा आपल्या अंतर्मनाच्या सर्वसमर्थ शक्तीवर पूर्ण विश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच आपण करत असलेल्या नामसाधनेवर आणि इतर साधनांवर पूर्ण विश्वास असला पाहिजे.

सकाम नामसाधनेचे रूपांतर काही काळानंतर निष्काम नामसाधनेत होते. श्री. सदगुरूंनी आपल्याला त्यामुळेच परमार्थासाठी प्रपंच करा असा उपदेश केला आहे. आपल्या साधनेचा वापर फक्त प्रापंचिक सुख मिळवण्यासाठी आपण वर्षानुवर्षे करीत राहिलो तर आपली पारमार्थिक उन्नती वेगाने होणे फार कठीण आहे. पण प्रपंचाकडे दुर्लक्ष करायला जीवनविद्या सांगत नाही तर दोन्ही कडे समान लक्ष द्या दोन्ही सुखी आणि यशस्वी जीवनासाठी आवश्यक आहेत. तुम्ही प्रपंचच असा युक्तीने करा की त्यातून परमार्थ आपोआप सिध्द झाला पाहिजे असे जीवनविद्या सांगते. या उपदेशात फार मोठे गुपित दडलेले आहे तसेच असा प्रपंच  करणे ही फार मोठी कला आहे आणि ती श्री. सदगुरूंना शरण गेल्याशिवाय ही कला आपल्या हाती लागू शकत नाही.

नामस्मरण असे झाले पाहिजे की एकांतात नामस्मरण करताना नामस्मरणाबरोबर आपल्या दिव्य स्वरूपाचे आणि भगवंताचे स्मरण झाले पाहिजे आणि जगात वावरताना बोलताना आपण प्रत्येक व्यक्तीत परमेश्वराच्या दिव्य व्यवस्थेचे दर्शन घेतले पाहिजे.

श्री. शाम भागवत यांनी नाम स्मरण हा जश्याचा तश्या प्रकारे येणारा विचार कसा आहे आणि तसा असण्याचे महत्त्व फार सुंदररीत्या समजावून सांगितले आहे.

नामस्मरण हा दिव्य विचार आहे तसेच भगवंताचे प्रत्येक नाम अतिशय अर्थपूर्ण आहे हे आपल्याला श्री. सदगुरूंनी अमृत मंथन व इतर अनेक ग्रंथांत समजावून सांगितले आहे. नाम कसेही घेतले तरी फळते असे नामाविषयी सांगितले जाते पण नाम या साधनेवर पूर्ण निष्ठा ठेवून तसेच आपल्यावर भगवंताने अनेक प्रकारे उपकार केले आहेत. त्याने सुंदर देह दिला. अनमोल ईंद्रिये दिली.भावना शक्ती-कल्पना शक्ती सारख्या शक्ती दिल्या. विधात्याने हे सुंदर विश्व निर्माण केले. आनंदाच्या सर्वांग अनुभवासाठी जीवन दिले. माता-पिता रूपाने आपली काळजी घेतली. शिक्षक बनून विश्वाचे ज्ञान दिले तर  श्री. सदगुरू रूपाने ज्ञान दृष्टी देऊन आणि याजगात कोणीही करणार नाही असे निरपेक्ष प्रेम दिले असे असताना त्या भगवंताचे आपण किती बरे कृतज्ञतापूर्वक स्मरण केले पाहिजे? हे विचार मनात आणून जर आपण नाम-स्मरण करू तर ते अर्थातच लवकर फळेल.

नामस्मरणाविषयी सुंदर मार्गदर्शन श्री. सदगुरूंनी जीवनविद्येचा मंगल कलश या ग्रंथात पान १३३ वर "नामस्मरण" या प्रकरणात केली आहे.

नामस्मरणाने आपल्याला कोणते लाभ होतील त्याचे छान उत्तर आपल्याला वर्षाने दिले आहे.

हरिपाठातील २७ अभंगात ज्ञानेश्वर महाराजांनी हरिनामाचा महिमा मुक्तकंठाने गायला आहे. हरिपाठाचा शब्दार्थ, भावार्थ आणि गुह्यार्थ समजावून सांगणारा ग्रंथ श्री. सदगुरूंनी ज्ञानेशांचा संदेश हा लिहिला आहे. हा ग्रंथ सर्वांनी वाचावा अशी नम्र विनंती आहे.

 नामस्मरणाच्या लाभाविषयी संतश्री एकनाथ महाराज म्हणतात,
नामापाशी तिष्ठे देव नामापाशी वसे भाव
नामापाशी मुक्तिगौरव अहर्निशी वसतसे
नामापाशी ऋध्दिसिध्दी नामापाशी ते समाधी
नामे तुटती उपाधी जन्मोजन्मीच्या
नामापाशी भुक्तिमुक्ती नामापाशी ते विरक्ती नामे पातके नासती
एका जनार्दनी नाम गाता निरसे भवभ्रम साधन उत्तम कलियुगामाझारि

प्रश्न क्र. ३ नामस्मरणाने आपल्या मनाची प्रगती कशी होत जाते?  यावर आता पुढे आपण चर्चा करू या.

नाम-स्मरण-प्रार्थनेची गोडी सर्वांना लागो ही श्री. सदगुरू चरणी तळमळीची प्रार्थना.........
Report to moderator   Logged

Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu!
May Divinity Within All get bloomed!
May God Bless all!
gargi
Junior Contributor
**
Offline Offline

Gender: Female
Posts: 85


« Reply #21 on: March 17, 2007, 08:52:16 AM »

Dear all,

Shri sadguru ,Mai aani sarvana  namskar karun namane manachi pragati kashi hote hya prashnavar  kelela abhyas shabdat mandaycha prayetna karit aahe.

Man he mulat chanchal asate. " bahu chanchal chapal. zata yeta nalage vel" Agadi survatila jevha aapun naam ghyala lagato tevha manavar kahich parinam hot nahi aahe ase vatate ani mahanun khup lok ithech naam sodtat. Agadi survatila  naam ghyala khivha prarthana mhanayla laglyvar, man maximum negative vichar subconscious mind through conscious mind la pathvayla lagate karan subconscious mind la negative feeding janmo janmi chya savyi pramane zale asate. He sagale sahan karun, shraddha aani saburine jevha sadhak naam attahasane ghyala lagato tevha subconscious mind madhe naam halu halu feed vhyala lagate. Mag prarthana sahaj kuthe aplya nakalat suru hote, jase jase prarthaneche/namache chintan aplya thikani vadhayla lagete and chanchaltene firnyara manat apan namachi kivha prarthene chi kathi ghalayala lagato tase tase, man halu halu nivant hote, vicharanche praman kami kami hot zauun, manala " silence' zanvayla lagato. Manala ha silence khup avdayla lagato and negative vichar yayla lagale ki man lagech naam kivha prarthana mhanayla lagate. Aata man prarthana mhanayla sandhi shodate, kuthe hi rikama vel milala ki man prarthana kivha naam ghete, manala namachi godi lagate. akhand nam smaran karata karata, man rupi man nahise houn tyache unmanit rupantar hote. Aani unmani chya avasthet jivala aplya divya sat chit anand swaroopachi prachiti yete, " unmani chya sthiti, pandurang bheti deti"

Sarvana hi unmani sthiti prarpt hou de hi sadguru charni prarthana
Report to moderator   Logged
gargi
Junior Contributor
**
Offline Offline

Gender: Female
Posts: 85


« Reply #22 on: March 18, 2007, 01:55:17 AM »

SHri Sadguru aani Mai na namaskar, sarvana namaskar,

shevtacha abhang thodha  chukala, tya badhal kshama magate. Mala nakki abhang athavat nahi pan ha mostly correct asava.  "unmani chya sukha aad, pandurag bheti deti"

Sarvaana hi unmani sthiti prapt hou de, hi sadguru charni prarthana
Report to moderator   Logged
gargi
Junior Contributor
**
Offline Offline

Gender: Female
Posts: 85


« Reply #23 on: March 18, 2007, 02:06:16 AM »



Saglyani prarthana kartana azun kahi tips share kelya tar navin sadhakana khup madat hoil. Dr Nutan, Shri Bhagwat, Geeta Tai- tumhi please amhala sadhana kashi enhance karta yeil yachya tips dyal ka?


Prarthana kashi maximum vadvaychi
samorcha manus ( samajat, kutumbat) jevha negative feeding karat asel tevha prarthana kashi manat aanaychi
sarvanchya madhe ( negative bolnarya manasanmadhe included)  ishvar kasa pahaycha
aapla ahankar chepun dusryacha ahankar japanyasathi practical tips aahet ka


Sarvana satat shubha vichar,ishwar smaran aai sadguru seva karnyachi buddhi hou de, sarvana sadgurunche dnyan aani margdarshan akhand milu de, sadguru aani mai na uttam aarogya aani udand aayush milun he jaag sukhi zalele pahayla milu de.
Report to moderator   Logged
Varsha
Senior Contributor
***
Offline Offline

Posts: 116


« Reply #24 on: March 20, 2007, 09:14:11 PM »

Hello Dr. Nutan,Mr. Sham Bhagwat and Geeta kaku
I just wonder how do u get time to write so beautifully and such a long posts in your busy schedules!
Reading them is a treat for us.Thanks a lot!

Dr. Nutan can u please tell us what is AAKASH BHAN?

Eshwara tuze god nav sarvancya mukhat akhand rahu de.
Report to moderator   Logged
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 308


« Reply #25 on: March 22, 2007, 11:30:44 AM »



Saglyani prarthana kartana azun kahi tips share kelya tar navin sadhakana khup madat hoil. Dr Nutan, Shri Bhagwat, Geeta Tai- tumhi please amhala sadhana kashi enhance karta yeil yachya tips dyal ka?


Prarthana kashi maximum vadvaychi
samorcha manus ( samajat, kutumbat) jevha negative feeding karat asel tevha prarthana kashi manat aanaychi
sarvanchya madhe ( negative bolnarya manasanmadhe included)  ishvar kasa pahaycha
aapla ahankar chepun dusryacha ahankar japanyasathi practical tips aahet ka


Sarvana satat shubha vichar,ishwar smaran aai sadguru seva karnyachi buddhi hou de, sarvana sadgurunche dnyan aani margdarshan akhand milu de, sadguru aani mai na uttam aarogya aani udand aayush milun he jaag sukhi zalele pahayla milu de.

खरोखरच अवघड विषय आहे हा.  पण चर्चेला सुरवात तरी व्हावी म्हणून माझे विचार लिहितोय.  आपण ध्यान-धारणा हा शब्द ऐकलेला असतो मात्र यामधे धारणा प्रथम असते व त्यानंतर ध्यान लागते असे संत सांगतात.  धारणा व ध्यान यामधेही एक पायरी असते त्याला तंद्रा असा शब्द आहे.  तंद्री हा शब्द आपल्याला ओळखीचा आहे.  तो देहबुध्दीद्वारे विषयांचे चिंतन चालू असताना देहभान हरपले असता वापरला जातो.  मात्र परमेश्वराविषयीची धारणा परिपक्व होऊ लागल्यावर त्या संबंधात चालू असलेल्या चिंतनात बुडून गेल्यामुळे माणूस तंद्रेत जातो.  या अवस्थेतून कधीतरी त्याला ध्यान लागते.  असो.

ज्याप्रमाणात आपली धारणा पक्की होऊ लागते त्याप्रमाणात आपली साधना (प्रमाण व दर्जा) वाढत जाते.  यासाठी धारणा कशी धरावयाची व ती कशी वाढवावयाची याचाच विचार करायला लागेल असे वाटल्याने चर्चेसाठी पुढील मुद्दे मांडत आहे.

१) "विश्वप्रार्थनेमुळे अथवा नामस्मरणामुळे आपले कल्याण होणार आहे" हा सुरवातीला फक्त विचार असतो.  या विचाराला श्रध्देचे पाठबळ मिळाले की त्या व्यक्तीची साधना सुरू होते.  वरील विचार निरनिराळ्या मार्गाने पक्का करणे म्हणजे धारणा धरणे होय.

२) ग्रंथवाचन, प्रवचने, किर्तने, ग्रंथदिंडी ह्या सर्वांचा उपयोग आपली ही धारणा पक्की करण्यासाठी होत असतो.  हे भान ठेवले तर या सर्वांचा जास्तीत जास्त फायदा उठवता येतो.

३) परमेश्वराचे स्वरूपाबद्दलचे चिंतन, इतरांबरोबरची चर्चा,  फोरममधला सहभाग हे सर्व आपली धारणा पक्की करण्यासाठी करत आहोत हे लक्षात ठेवले तरीही यातून आपल्याला जास्तीत जास्त फायदा उठवता येईल असे वाटते.  मात्र येथे एक पथ्य पाळावयाचे असते.  जो चर्चा खूप करतो पण प्रत्यक्ष साधना मात्र करत नाही अशांशी शक्यतो चर्चा टाळलेली बरी असते.

४) फावल्या वेळात नामस्मरण अथवा विश्वप्रार्थना करण्याचा हाच हेतू आहे की त्यामुळे आपल्याला त्या परमेश्वराचे स्मरण कळत नकळत राहाते व आपली धारणा पक्की होत जाते.  याची परिणिती म्हणून त्या व्यक्तीला दररोज काही काळ एकांतात बसून नामस्मरण अथवा विश्वप्रार्थना करावीशी वाटू लागते.  मात्र यासाठी परमेश्वर, ईश्वर, जीव, देहबुध्दी इ. बद्दलच्या संकल्पना स्पष्ट असल्या पाहिजेत.  (मला नक्की माहित नाही पण सद्‌गुरूंचे ग्रंथ वाचून त्यांच्याबद्दल माझ्या मनात त्यांच्याबद्दल जी प्रतिमा तयार झाली आहे त्यानुसार ते त्यांच्या साधना काळात दिवसातून कमीत कमी ३ ते ३॥ तास एकांतात नामस्मरण करत असले पाहिजेत असे वाटते.  याबाबत जाणकार मंडळीच सांगू शकतील.)

५) सद्‌गुरू हे आपले सर्वस्व आहेत असे आपल्याला मनापासून वाटते.  अगदी तसेच नामस्मरण अथवा विश्वप्रार्थना हे आपले सर्वस्व आहे असे वाटू लागणे किंवा माझे सर्व प्रश्न / शंका या नामस्मरणाने अथवा विश्वप्रार्थनेनेच सुटणार आहेत असे वाटू लागले की धारणा पक्की होऊ लागली असे समजले जाते.  असे होऊ लागले की, "सद्‌गुरू व नामस्मरण" अथवा "सद्‌गुरू व विश्वप्रार्थना" हे दोन्ही वेगवेगळे नसून दोन्हीही एकच आहेत असे वाटू लागते.  किंबहुना यातूनच विश्वप्रार्थना अथवा नामस्मरणात प्रत्यक्ष सद्‌गुरूंचाच वास आहे अशी धारणा धरली जाऊन आपली साधना सर्वार्थाने वाढू लागते.

ही धारणा पक्की होण्यासाठी आपल्या पूर्वसुरींनी काही नित्यनेम सांगितले आहेत.  त्यांचा डोळसपणे वापर केला तर आपण खूप काही साधू शकू असे वाटल्याने त्याची काही उदाहरणे देत आहे.

१) उठल्याबरोबर प्रात:स्मरण (डोळे मिटून एकाजागी बसून शांतपणे.  यासाठी कितीवेळ द्यावयाचा हे ज्याचे त्याने ठरवावे.)
२) झोपताना नामस्मरण अथवा विश्वप्रार्थना करत करत झोपण्याची सवय लावून घेणे.
३) संध्याकाळी दिवा लावताना स्मरण करणे (डोळे मिटून एकाजागी बसून शांतपणे.  यासाठी कितीवेळ द्यावयाचा हे ज्याचे त्याने ठरवावे.) अथवा शक्य असेल तर व घरचा तसा परिपाठ असेल तर
४) दिवेलागणीला सद्‌गुरूंच्या फोटोपुढे उदबत्ती, निरांजन लावून त्यांना नमस्कार करून काही काळ डोळे मिटून शांत बसणे.
५) घरातून बाहेर पडताना सद्‌गुरूंच्या फोटोपुढे जाऊन त्याना नमस्कार करून त्यांना सांगून जाणे अथवा सद्‌गुरूंना मनातल्या मनात तसे सांगून जाणे.
६) बाहेरून घरात आल्यावर हातपाय धुवून सद्‌गुरूंच्या फोटोपुढे अथवा मनाने नमस्कार करणे व आपण परत आलो असल्याचे सांगणे.
७) काही खाताना अथवा पिताना मनातल्या मनात सद्‌गुरूंचे स्मरण करणे. (नेवैद्य)
८) घरात एखादा चांगला पदार्थ केला तर स्वत: खाण्या अगोदर तो सद्‌गुरूंना अर्पण करणे (नेवैद्य दाखवणे)  येथे कर्मठ पणा नको.
९) नवीन कपडे आणले तर प्रथम सद्‌गुरूंच्या फोटोपुढे ठेवणे.  किंवा नवीन वस्तू आणली तर तसे सद्‌गुरूंना सांगणे.
१०) एखादी चांगली घटना घडली असेल किंवा कानावर आली असेल तर सद्‌गुरूंच्या फोटोपुढे साखर ठेवणे. (कृतज्ञता)
११) वाईट घटना घडली असली तरी त्यामधे सद्‌गुरूंचा काहीतरी चांगलाच उद्देश असणार किंवा एक भोग आपण भोगून संपवला तेवढेच आपले अनिष्ट संचित कमी झाले असे मानणे व त्याबद्दल सद्‌गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे.
१२) ऑफिसमधे काम करत असताना त्या विश्वव्यापक परमेश्वराच्या स्वनियंत्रीत, स्वयंचलीत यंत्रणेमार्फत आपल्यासाठी निश्चीत झालेले काम आपण करत आहोत असे मधून मधून मनाला समजावून सांगणे.  म्हणजे आपल्या कामाचा दर्जा तर उंचावतोच शिवाय कष्ट कमी झाल्यासारखे वाटतात.  तसेच आपले काम चांगले झाले तरीही अहंची बाधा होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात मावळते.
१३) नकारात्मक विचारसरणीचा माणूस भेटल्यास व त्याला टाळणे शक्यच नसल्यास त्या विश्वव्यापक परमेश्वराच्या स्वनियंत्रीत, स्वयंचलीत यंत्रणेचीच तशी ईच्छा आहे असे समजून त्या माणसाला प्रतिसाद देण्याची वेळ आलीच तर, अशा प्रतिसादाने आपणाकडून आपल्यासाठी अनिष्ट नियती निर्माण  झाली नाही पाहिजे असे मनाला बजावणे.  (खरे म्हणजे अशा वेळेस हा विचार जरी मनात आला तरी त्या प्रसंगाची कटूता खूपच कमी होऊ शकते तसेच कोणत्याही प्रकारचे नकारत्मक भाव आपल्या चेहऱ्यावर तसेच आपल्या देहबोलीतून उमटत नाहीत.  त्यामुळे आपले नकारात्मक भाव लपविण्याचा प्रयत्नही करायला लागत नाहीत व आपल्या वागण्यात आपोआपच सहजता येते असे माझे वैयक्तीक मत आहे.)

हे सर्व मी वानगीदाखल नमुने दिले आहेत.  स्थळ, काळ व वेळ तसेच कुटुंबातील परंपरा याचा ज्याचा त्याने विचार करायचा आहे हे लक्षात ठेवले की झाले.  थोडक्यात

"सद्‌गुरू आपले सर्वस्व असून त्यांनी सांगितल्या प्रमाणे जर मी विश्वप्रार्थना अथवा नामस्मरण केले तर त्यातच माझे अंतीम कल्याण आहे" हा विचार ज्यायोगे पक्का होत जाईल ते ते सर्व करत राहाणे म्हणजे सत्संग व ज्यामुळे आपला हा भाव कमी होत जाईल ते ते सर्व टाळणे म्हणजे नित्संग हे एकदा आपल्या लक्षात आले की बऱ्याच गोष्टी आपल्याला कर्मठ पणा टाळून तसेच या सर्वांना कवायतीचे स्वरूप न देता डोळसपणे करता येते.  यामधून आपण आपल्या जीवनाला एक लय देऊ शकतो इतकेच नव्हे तर आपण आपल्या मुलांवरही अगदी सहजपणे उत्तम संस्कार करू शकतो.  कारण मुले साधारणत: अनुकरणप्रिय असतात.

सर्वांना नमस्कार, सर्वांना शुभेच्छा.
« Last Edit: March 22, 2007, 11:39:48 AM by shambhagwat » Report to moderator   Logged
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Female
Posts: 429



« Reply #26 on: March 22, 2007, 03:03:03 PM »


अखिल विश्वाला शांतीसुखाचा राजमार्ग दाखवणाऱ्या सदगुरू श्री. पै माऊली यांना अनंत कोटी नमस्कार तसेच त्यांना सावली सारख्या साथ देणाऱ्या सौ. माईंना अनंत कोटी नमस्कार.

आपण अनुग्रह घेतो तेंव्हा आपली मानसिक स्थिती अशी असते की आपण श्री. सदगुरू जे सांगतील ते करायला अगदी तत्पर असतो. श्री. सदगुरू कृपेने आपल्या मनात प्रार्थनेचे स्फ़ुरण सुरू होते त्यानंतर आपण प्रार्थनेसाठी वेळ देऊ लागतो आणि भरपुर आणि सुंदर अशी प्रार्थना होऊ लागते. प्रार्थनेत मन रमते व  मनाला अतिशय आनंद होऊ लागतो असे वाटते की प्रार्थनेतच रहावे.
पण ही स्थिती काही काळानंतर बदलते वेगवेगळ्या कारणांमुळे आपण पुर्वीसारखा प्रार्थनेला वेळ देऊ शकत नाही कारणे अनेक प्रकारची असु शकतात जसे आपल्या घरी एखादे कार्य करण्याचे ठरणे, बऱ्याच दिवसांसाठी प्रवासाला जाणे, पाहुणे घरी बऱ्याच दिवसांसाठी रहायला येणे, घरातील कोणाचे मोठे आजारपण, जवळच्या नातेवाईकांचा आकस्मिक मृत्यु वगैरे तर कधी मनाला बिलकुल न आवडणारी घटना घडणे वगैरे अशा वेळेस आपले प्रार्थनेवरील लक्ष ऊडते.   जो बंध आपला श्री. सदगुरूंमध्ये असतो तो परत आपण प्रयत्नपुर्वक जुळवायचा असतो. मग परत पुर्वीसारखी प्रार्थना सुरू होते.  जेंव्हा आपण मनाने अस्वस्थ होतो तेंव्हा त्याचा प्रार्थनेवर परिणाम होतो हा परिणाम मन जर भावनाशील असेल जसे बऱ्याच भगिनींचे असते त्यांच्याबाबतीत जास्त प्रमाणात होतो म्हणून श्री सदगुरू भावनाप्रधान बुध्दी पेक्षा बुध्दीप्रधान भावना श्रेष्ठ आहे असे म्हणतात. ही स्थिती आपण प्रयत्नपुर्वक साध्य करावयाची आहे.
त्यासाठी आपल्याजवळ सबुरी असणे आवश्यक आहे. तसेच आपण श्री. सदगुरू ग्रंथांचे वाचन, श्री. सदगुरू व त्यांच्या शिष्यांची प्रवचने ऐकणे, प्रत्यक्ष जमत नसल्यास सी. डी व कॅसेटस् ऐकणे, अभ्यासक्रम करणे, श्री. सदगुरू कार्यात जमेल तसा धनाने, मनाने, तनाने भाग घेणे ह्या गोष्टी करू शकतो.
यासाठी श्री. गुरूंच्या सतत अनुसंधानात असणे आवश्यक आहे. आई दिवाणखान्यात असेल, किचन मध्ये नाहीतर बाथरूम मध्ये असली तरी तिला बाळाच्या रडण्याचा आवाज सर्वप्रथम ऐकू येतो व ती लगेच धावत येते तसे आपण कोणतेही काम करत असू आपले सर्व लक्ष हे श्री सदगुरूंचे ध्यान करण्याकडे-प्रार्थनेकडे असले पाहिजे असे सतत अनुसंधान करण्याचा प्रयत्न केला की प्रार्थना परत पुर्वी सारखी होऊ लागते. सतत मनात म्हणायचे की हे सदगुरूराया सर्वांकडून खूप खूप प्रार्थना होऊ दे, सर्वजण ह्या प्रार्थनेत राहू देत सर्वांना या अमृतमय प्रार्थनेची गोडी लागू दे मग पहा प्रार्थना कशी छान होते ती!
तसेच आपण श्री सदगुरू व माईंची मानसपुजा दररोज करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
आपण रोज सकाळी उठतो तेंव्हा प्रार्थनेची आठवण आहे का ते बघायचे मग दात ब्रश करताना, बाथ घेताना, अंग पुसताना, कपडे घालताना, केस विंचरताना, आरशात पहाताना, ब्रेकफास्ट तयार करताना व सर्व्ह करताना, खाताना, प्रत्येक वेळेस पाणी पिताना, जेवताना, घरातली कामे करताना, न्युज पेपर वाचताना, असे सर्व कामे करताना, बसताना, ऊठताना, चालताना, झोपताना असे आपण सारखे प्रार्थनेत आहोत का हे स्वतःच पहायचे. याचा आपण चार्ट बनवून रोज स्वतः टीक करू शकतो आणि मग आपले आपण चेक करायचे आपल्यात सुधारणा होत आहे का?
थोडक्यात श्री. सदगुरूंचे कृतज्ञतेने स्मरण हा परमार्थ प्रगतीचा पाया आहे ज्याच्यावर आत्मज्ञानाची इमारत बांधली जाऊ शकते.
श्री. सदगुरूंशी आपल्याला जवळचा संबंध प्रस्थापित करायचा असेल तर आपण कोणता तरी भाव ठेवला तर आपण त्यांच्या अधिक जवळ जातो.. कोणी श्री. सदगुरूंना आपला पिता म्हणतात तर कोणी त्यांना माऊली म्हणजे आई तर कोणी आपला जवळचा सखा समजतात. आपल्या मनाला जो भावेल तो भावसंबंध आपण श्री. गुरूंशी जोडायचा व त्या भावाने त्यांचे कृतज्ञतापुर्वक चिंतन करायचे असे करताना होणारा आनंद शब्दात व्यक्त करणे शक्य नाही ही ज्याची त्याने अनुभवण्याची गोड अतिशय गोड गोष्ट आहे.

गार्गीने हा विषय सुचवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

श्री. सदगुरू स्मरणातला गोड आनंद सर्वांना अनुभवायला येवो व त्याची गोडी लागो ही श्री. सदगुरू चरणी प्रार्थना...............
Report to moderator   Logged

Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu!
May Divinity Within All get bloomed!
May God Bless all!
gargi
Junior Contributor
**
Offline Offline

Gender: Female
Posts: 85


« Reply #27 on: March 23, 2007, 05:05:22 AM »


Thankyou so much Dr Nutan aani Shri Bhagwat. Sadguru tumchya rupaane amha sarvana sadhana improve karayla uttam Madat karit aahet. Khup khup thanks.

Sarvana sadgurunce dyan ani margadarshan akhand milude hi sadguru charni prarthana

Report to moderator   Logged
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Female
Posts: 429



« Reply #28 on: April 02, 2007, 01:46:10 AM »

अखिल मानवजातीला शांती-सुखाचा राजमार्ग दाखवणाऱ्या आणि आम्हा सर्व नामधारकांवर अनंत उपकार करणाऱ्या श्री. सदगुरी पै माऊलींना अनंत कोटी नमस्कार. सौ. माईंना ८१ व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा व त्यांना आणि श्री. सदगुरूंना निरामय आरोग्य लाभो आणि त्यांचे अनेक वाढदिवस साजरे झालेले आम्हा नामधारकांना पहायला मिळोत ही परमेश्वराजवळ प्रार्थना.....

पत्र लिहिण्यास विलंब झाला त्याबद्दल क्षमस्व. सर्वांना सप्रेम नमस्कार.
नाम साधनेचा मनाच्या प्रगतीवर कसा परिणाम होतो याचे चिंतन करण्याचा प्रयत्न श्री कृपेने करू या.
        आपण अनुग्रह घेतो तेंव्हा आपल्यापैकी काही जण परमेश्वराची भक्ती करण्यासाठी श्री. गुरूंचे मार्गदर्शन मिळावे म्हणून त्यांना शरण जातात.  काहीजण श्री. गुरू आपल्याला आपण असलेल्या संकटात-समस्येत मार्गदर्शन करतील म्हणून तर काही आपली ईच्छापूर्ती व्हावी म्हणून त्यांना शरण जातात. कोणत्याही कारणामुळे आपण त्यांना शरण गेलो तरी श्री. गुरूंनी सांगितल्याप्रमाणे आपण साधना करू लागलो की त्याचा परिणाम हा आपल्या मनावर होतोच. जसे आपण तूप कोणत्याही प्रकारे खाल्ले तरी त्याचा शरीरावर परिणाम झाल्यावाचून रहात नाही.
      आपल्या मनावर कित्येक जन्मांचे संस्कार असतात. या जन्मातील संस्कार आपल्या जाणत्या वयातील विचारांवरून -बोलण्यावरून लक्षात येतात तर पूर्वीच्या जन्मातील संस्कार जन्मतः अंतर्मनात वास करत असतात व ते आपल्या बाल्यावस्थेतील  आवडी-निवडी व स्वभावावरून लक्षात येतात.  आपले विचार हे बहिर्मनावर कोणत्या विचारांचा प्रभाव पडतो व ते कोणते विचार accept करते यावर अवलंबून असतात. त्याच त्याच विचारांचे जेंव्हा चिंतन होते आणि त्यांना भावना व कल्पना यांचे खत-पाणी मिळाले की ते विशिष्ट विचार अंतर्मनात खोल जातात व जीवनात साकार होतात. याविषयी सुंदर मार्गदर्शन श्री. सदगुरूंनी अमृतमंथन या ग्रंथात "शंकर म्हणतो तथास्तू"  या प्रकरणात केले आहे.
    हे संस्कार खूप कमी वेळा पारमार्थिक प्रगतीच्या दृष्टीकोनातून साधक-पूरक योग्य असतात तर श्री सदगुरू आपल्याला सांगतात त्याप्रमाणे हे जास्तीत जास्त वेळा बाधकच असतात. जाती-धर्म-पंथ-वंश यांचा दुराभिमान निर्माण करणारे विचार, तसेच तू फक्त स्वतःचा विचार कर जगाचा विचार करण्याची काय गरज आहे असे सांगणारे विचार अत्यंत संकुचित-दुषित आहेत. अशाप्रकारचे विचार जर आपण संस्कारांमुळे धारण केलेले असतील तर त्यात श्री. गुरुंचा अनुग्रह घेतल्यावर  त्यांची प्रवचने ऐकून त्यांचे ग्रंथ वाचून व प्रार्थना-नामस्मरण करीत राहिल्यानंतर हळूहळू निष्प्रभ होत जातात.
माझ्या स्वतःवर वैद्यकिय शिक्षण घेत असताना आपण व रूग्ण यांच्यात दरी ठेऊन वागले पाहिजे अशा प्रकारचे संस्कार झाले त्याचा असा परिणाम झाला की मी अनोळखी व्यक्तींशी वागताना थोडेसे तुटकपणे वागत असे आणि सुरवातीला तसेच गुरू-बंधू व गुरू भगिनींशीही वागत असे आणि त्यामुळे मला सुरवातीला सुखसंवाद करायला श्री. सदगुरूंनी सांगितले तेंव्हा माझ्याकडून त्यांची आज्ञा पाळली गेली नाही आणि याबद्दल माझ्या मनात अतिशय खंत व पश्चात्तापाची भावना आहे.
आपल्यावर झालेले बरेचसे संस्कार आपल्या आई-वडीलांनी नातेवाईकांनी आपले भले व्हावे म्हणून केलेले असतात पण प्रत्यक्षात त्यामुळे आपले व इतरांचे खरे भले होण्याऐवजी नुकसानच होते. आपण व्यवहारात सावधपणे वागले पाहिजे, भोळसटपणे वागता कामा नये हे तर खरेच आहे पण त्याच बरोबर आखडूपणाने किंवा अहंकाराने वागण्याचे काहीच कारण नाही. अशा प्रकारचे आपल्यावर झालेले वाईट संस्कार आपल्याला श्री. सदगुरू कृपेने जसजशी साधना वाढेल तसतसे हळूहळू लक्षात यायला लागतात व आपल्यात सुधारणा होऊ लागते.
आपण जर मितभाषी असू तर थोडे मोकळे पणाने बोलणारे होतो व जर खूप बडबड्या-बोलक़्या स्वभावाचे असू तर कमी बोलायला लागतो. आपल्यात आत्मविश्वास निर्माण होतो व त्यामुळे आपण समाजात सर्व ठिकाणी अधिक प्रभावी भूमिकेत वावरायला लागतो. आपण जर खूप रागीट असू तर बऱ्याच प्रमाणात त्यावर नियंत्रण येते हा माझा आणि इतर बऱ्याच नामधारकांचाही अनुभव आहे.
श्री. सदगुरूंच्या प्रबोधनाचा व त्यांच्या ग्रंथ-वाचनाचा व साधनेचा एकत्रित असा परिणाम नामधारकांच्या विचारसरणीवर व वर्तणुकीवर होतो. अनेक व्यक्तींची दारू, गुटखा-तंबाखू यांची व्यसने श्रींचा अनुग्रह घेतल्यावर त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधना केल्यावर सुटली आहेत. आत्मश्रध्देवर विश्वास व त्यामुळे अंधश्रध्दा व अंधविश्वास यांतुन मुक्ती या गोष्टी श्रींनी सांगितल्याप्रमाणे श्रवण व साधना करत गेल्यानेच घडतात.   
नकारात्मक विचार करण्याची, अशुभ चिंतन स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल करण्याची सवय आपल्यापैकी बहुतेकांना लागलेली असते ही सवय जन्मोजन्मीची असते त्यामुळे ही सवय काढणे अतिशय जड जाते पण आपल्याला सत्संगतीत वारंवार त्याबद्दल सावध रहायला सांगितले जाते त्यामुळे त्याचा योग्य तो परिणाम होतो. सदगुरूकृपा आणि साधनेमुळे आपली बेसिक आवडच बदलून जाते. मनात आमूलाग्र बदल घडतो . मी भले माझे काम भले ही वृत्ती जाऊन मला इतरांच्या भल्यासाठी जास्तीत जास्त काय करता येईल असे विचार-चिंतन मनात सुरू होते यामुळे आपण श्री. सदगुरूंना अधिक प्रिय होत आहोत-सदगुरू आपल्याला अधिक प्रिय होत आहेत असे सुंदर चक्र तयार होते व हे चक्र साधकाच्या जीवनात जशी साधना-सेवा वाढेल तसे अधिक गतीने फिरू लागते व त्यातूनच साधकाची अधिकाधिक प्रगती होत जाते. मन अधिकाधिक विशाल होत जाते.
या सर्वाचा परिणाम असा होतो जीवनातल्या कोणत्याही कठीण प्रसंगाला खंबीरपणे आत्मविश्वासाने तोंड द्यायला साधक तयार  होतो. प्रपंच आणि परमार्थ याची सुरेख सांगड घालत आपली आणि समाजाची भौतिक आणि पारमार्थिक प्रगती साधण्याच्या दृष्टीकोनातून साधकाची वाटचाल सुरू होते. त्याच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर त्याला श्री. सदगुरू आपल्याबरोबर आहेत याची सतत जाणीव असते. आणि श्री.सदगुरूंचे त्याला आतून आणि बाहेरून दोन्ही प्रकारे मार्गदर्शन मिळत असते व त्याआधारे तो आपली सर्व कर्तव्ये आणि साधना दोन्ही पार पाडीत स्वरूपचंद्राच्या दिशेने झेप घेतो.
प्रिय वर्षा, आकाशभान साधनेविषयी काही लिहिता येत नाही त्याबद्दल क्षमस्व. advance course मध्ये साधना देताना आम्हाला असे सांगितले गेले की येथे शिकविलेल्या साधनेविषयी कोणालाही काही सांगावयाचे नाही.
मनाची साधनेत जशी प्रगती होत जाते तसतशी आपली सर्व गोष्टीतली आसक्ती,  तसेच अट्टाहास आणि आग्रह-अपेक्षा कमी होत जातात. नम्रता, विवेक, दया, क्षमा, समाधान, शांती, करूणा यांनी मन व्यापून जाते. आपण एक एक पायरी उतरत खाली कसे आलो आणि आता आपल्याला नामस्मरण व इतर साधना करीत प्रत्येक पायरी चढून वर कसे जायचे आहे याचे सुंदर मार्गदर्शन "नाम आणि सहजावस्था"  या "नामाचा नंदादीप" यातील पान ७४ प्रकरणात श्री. सदगुरूंनी समजावून सांगितले आहे ते जिज्ञासूंनी जरूर पहावे.

यानंतर आपण "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार" या ग्रंथाचा अभ्यास करू या.

प्र. १)   "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार" हा सिध्दांत ऐकल्यावर आणि हा ग्रंथ वाचल्यावर या सिध्दांताविषयी आपल्या मनात कोणकोणते विचार येतात?

श्री. सदगुरूंच्या मार्गदर्शनाखाली अनेक नामधारकांची प्रगती झाली. त्यांनी आपल्या जीवनाचे सार्थक करून घेतले तशी बुध्दी सर्वांना होवो आणि सर्वांच्या जीवनाचे परम कल्याण होवो ही श्री. सदगुरू चरणी प्रार्थना............

« Last Edit: April 02, 2007, 01:49:45 AM by dr.nutanpol » Report to moderator   Logged

Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu!
May Divinity Within All get bloomed!
May God Bless all!
Deepak_jvm
Global Moderator
Senior Contributor
*
Offline Offline

Posts: 124


« Reply #29 on: June 17, 2007, 03:43:46 PM »

Dear All,
Discussion on Tuch Ahes Tuzya Jeevanacha Shilpakar is continued under separate topic: Eabhhyasvarg -Tuch Ahes Tuzya Jeevanacha Shilpakar

God bless you,
Deepak
Report to moderator   Logged
Pages: 1 [2]   Go Up
  Print  
 
Jump to:  

Powered by MySQL Powered by PHP Powered by SMF 1.1.14 | SMF © 2006-2011, Simple Machines LLC Valid XHTML 1.0! Valid CSS!