Jeevanvidya Discussion Forums
May 20, 2012, 12:39:46 AM *
Welcome, Guest. Please login or register.

Login with username, password and session length
News: Note: New user registration is Enable till 15 Aug 2011
 
  Back to Website   Home   Help Search Login Register  
Pages: [1]   Go Down
  Print  
Author Topic: दीपस्तंभातील सुंदर लेख-  (Read 2175 times)
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Female
Posts: 429



« on: September 13, 2007, 06:14:24 PM »

 

     जीवनविद्येचा कार्यकर्ता-

जीवनविद्येचा दीपस्तंभ- अंक-जानेवारी ते मार्च २००६.
 लेखक-श्री. सुभाष केळकर -भाग-१

    सदगुरू श्री. वामनराव पै सांगतात जीवन जगणे म्हणजेच संसार. संसार हा सुखाचा करणे म्हणजे परमार्थ. हा सिध्दांत अतिशय क्रांतीकारी आहे. कारण त्यात बरेच सिध्दांत सूत्ररूपाने लिहिलेले आहेत. जसे की,

  १) संसार व परमार्थ वेगळेपणाने करायचे नसतात. संसारच असा करायचा की, परमार्थ त्यातून आपोआप सिध्द झाला पाहिजे.
  २) संसार सुखाचा करणे याला महत्त्व आहे. जगतात सर्व पण जगतात कसे हे महत्त्वाचे.
  ३) संसार सुखाचा करायचा असतो, तो आपोआप होत नाही.

 आता प्रश्न असा निर्माण होतो तो असा की, हा संसार सुखी करायचा कसा?

   या प्रश्नाचे वेगळे उत्तर असे की,  सदगुरू श्री. वामनराव पै यांचा नामधारक (शिष्य़) होऊन जीवनविद्येचा सक्रीय कार्यकर्ता होणे.

   या उत्तरात तीन महत्त्वाचे घटक आहेत.

  १) सदगुरू श्री. वामनराव पै.
  २) जीवनविद्या
  ३) सक्रीय कार्यकर्ता

  यात जो तिसरा घटक आहे तो आपण झालो की आपले कार्य संपले.
यांसंबंधी अधिक खुलासा करणे अधिक इष्ट वाटते. या जगातील सर्वात दुर्मिळ गोष्ट कोणती? तर जीवनविद्येचा सक्रीय कार्यकर्ता होणे.

            हरिनामात किंवा विश्वप्रार्थनेत रंगलेली जिव्हा जशी दुर्मिळ गोष्ट आहे तशीच अलौकिक  गोष्ट म्हणजे जीवनविद्येचा सक्रीय कार्यकर्ता होणे. शुभ चिंतनात रंगलेली ही जिव्हा मन स्थिर करते व सुंदर, सुरेख विचारांनी भारून टाकते, प्राण पांगुळतात आणि प्रत्यक्ष श्रीहरि सर्व इंद्रियातून प्रकट होतो. सदगुरू सांगतात,  "जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल व जो मन जिंकेल तो जग जिंकेल." जीभ ताब्यात तर मन ताब्यात. मन ताब्यात तर प्राण ताब्यात.  जीभ,  मन आणि प्राण ताब्यात तर देव ताब्यात. याच चालीवर जीवनविद्येचा सच्चा कार्यकर्ता जिथे तेथे कार्यरूपाने प्रत्यक्ष सदगुरू तेथे. कार्यकर्त्यांच्या रूपाने जीवनविद्या मूर्तिमंत असते व जिथे सदगुरू आणि जीवनविद्या तेथे दिव्यत्व, सुख, शांती, समाधान व समृध्दी.   
                 
   जीवनविद्येचा कार्यकर्ता कोण? "कार्य सदगुरूंचे आणि कर्ता सदगुरू हा ज्याचा सच्चा भाव तो कार्यकर्ता. सदगुरूंचे कार्य कोणते? हे जग जीवनविद्येच्या ज्ञानाने सुखी करणे आणि हिंदुस्थान हे राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या अग्रेसर नेणे. हे करण्यासाठी हा कार्यकर्ता संसाराच्या अंगाने समाज उपयुक्त नोकरी, व्यवसायाय "Love work" करीत असतो. तर परमार्थाच्या अंगाने रिकाम्या वेळी "Bless all" करीत असतो म्हणजे सर्वांविषयी शुभचिंतन करणारी विश्वप्रार्थना सतत म्हणत असतो. या कार्यकर्त्याला श्री. सदगुरूंचे महत्त्व, महती आणि महात्म्य ज्ञान समजलेले, पटलेले आणि रूचलेले असते. सदगुरू आपले कार्य करून घेतच असतात पण या दिव्य कार्यात खारीचा वाटा उचलण्याचे मह्द् भाग्य जे आपणाला मिळाले आहे ती एक न भुतो सुवर्णसंधी आहे हे ओळखून अत्यंत मनापासून आणि सेवा भावनेने हा कार्यकर्ता कार्याचे शिवधनुष्य पेलत असतो.

    खरा कार्यकर्ता हा श्री. सदगुरूंचा निस्सीम भक्त असतो. सदगुरू हाच देव ही भूमिका आणि मानसिकता ठेवूनच तो जीवन जगत असतो. श्री. सदगुरूंना अपेक्षित आचरण करणे हा त्याचा स्वधर्म असतो. Love work,विश्वप्रार्थना, नामस्मरण आणि उपासना यज्ञ, ग्रंथ दिंडी व संपर्क फेरी, अभ्यास वर्ग , जीवनविद्येचा सत्संग इ. गोष्टी हे त्याचे वेदविहित कर्म असते. श्री. सदगुरूंची प्रवचने/कीर्तने ऐकणे हे त्याचे श्रवण असते. श्री. सदगुरूंचे गंथ अभ्यासपूर्वक वाचणे हे त्याचे साधन असते. श्री. सदगुरूंची मनोभावे केलेली मानसपूजा हेच त्याचे पूजन असते. श्री. सदगुरू स्मरणात रंगून जाणे हे त्याच्या दृष्टीने खरे भजन असते. श्री. सदगुरूंच्या प्रवचनातील सिध्दांतावर इतर सुजाण कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करणे हे त्याचे कीर्तन असते. सदगुरूंनी सांगितलेल्या आणि शिकवलेल्या साधना करणे हे त्याचे व्रताचरण असते. एका वाक्यात सांगायचे झाले तर अशा अलौकिक कार्यकर्त्यांचा रक्तगट A+, B+, O+ वगैरे नसून "श्री. सदगुरू" च असतो.
 
   श्री. सदगुरूंचे एवढे महत्त्व का? आतापर्यंत अनेक संत, महंत, विचारवंत झाले परंतु सदगुरू श्री. वामनराव पै हे खऱ्या अर्थाने राष्ट्रसंत, विश्वसंत व सदगुरूंचे सदगुरू शोभणारे असे लोकोत्तर युगपुरूष आहेत. त्यांनी जे अनेक अलौकिक आणि क्रांतिकारी सिध्दांत मांडले ते बघता, ते जसे एक थोर संत, विचारवंत, तत्वज्ञ आहेत तसेच अत्यंत प्रतिभावंत असे शास्त्रज्ञ देखील आहेत हे खचितच पटते. जीवनविद्येच्या ज्ञानाची त्यांनी केलेली अभिनव मांडणी बघता त्यांच्या दिव्य प्रतिभा शक्तीची आणि कल्पकतेची प्रचिती येते. चांगले वागावे हे बऱ्याच जणांनी सांगितले. परंतु चांगले का वागावे याचे सर्वांना समजेल असे शास्त्र श्री. सदगुरूंनीच प्रथम मांडले. ते प्रवचनांची बिदागी घेत नाहीत. ग्रंथांचे मानधन व गुरूदक्षिणा घेत नाहीत. कोणाकडूनही कसलीच अपेक्षा न ठेवता , सर्वांचे भले व्हावे ही स्वाभाविक तळमळ सातत्याने उराशी बाळगून    आता वयाच्या ८४व्या वयात सुध्दा त्यांच्या कार्याचा वेग वाढता आहे.     

                                                                Contd..........
 
 
 



Report to moderator   Logged

Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu!
May Divinity Within All get bloomed!
May God Bless all!
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Female
Posts: 429



« Reply #1 on: September 13, 2007, 09:06:43 PM »

 
   जीवनविद्येचा कार्यकर्ता- लेखक श्री. सुभाष केळकर-  भाग-२

        श्री. सदगुरूंनी जीवनविद्येची ५ दैवते सांगितली. आहेत. आदरणीय+ आचरणीय. ती म्हणजे म्हणजे भगवान श्री. कृष्ण, आर्य चाणक्य, छत्रपती शिवाजी महाराज,सावता माळी व एकनाथ महाराजांचे सदगुरू श्री. जनार्दन स्वामी. त्यांनी न सांगितलेले सहावे दैवत म्हणजे स्वतः श्री. वामनराव पै. मूर्तिमंत जीवनविद्या म्हणजे श्री.सदगुरू. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी सामान्य लोक गिफ्ट घेऊन आनंदोत्सव साजरा करतात. परंतु श्री.सदगुरू मात्र त्यांचा प्रत्येक वाढदिवस आनंद मेळावा म्हणून साजरा करतात व अखिल मानवजातीला जीवनविद्येच्या ज्ञानामृताची गिफ्ट देतात. त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर गुरू तेथे ज्ञान, ज्ञान तेथे शहाणपण, शहाणपण तेथे नारायण, नारायण तेथे सुख, शांती, समाधान. श्री. सदगुरूंकडून मिळणारे जीवनविद्येचे दिव्य ज्ञान संसाराच्या अंगाने शहाणपण देऊन परमार्थाच्या अंगाने आत्मज्ञान देते व आपले जीवन कृतार्थ होते. अशा या अलौकिक युगपुरूषाला अनंत कोटी साष्टांग प्रणिपात.

   कार्यकर्त्याचा दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे तो जीवनविद्या जगत असतो. जीवनविद्या वाटते सोपी पण आहे कठीण. खरा कार्यकर्ता झाल्याशिवाय ती कळूच शकत नाही हा अनेकांचा अनुभव आहे. खऱ्या कार्यकर्त्याला जीवनविद्येचे वेगळेपण ज्ञानाच्या अंगाने पटलेले असते. हे जीवनविद्येचे वेगळेपण कोणते?सांगायला गेले तर भले मोठे पुस्तकच लिहावे लागेल. पण सूत्र रूपाने सांगायचे झाले तर खालील प्रमाणे मुद्दे मांडता येतील.

  १) जीवनविद्येचे तत्वज्ञान विज्ञाननिष्ठ, तर्कशुध्द, अनुभवसिध्द खऱ्या अर्थाने धर्मातीत शाश्वत व वैश्विक आहे.
  २) विज्ञान, प्रज्ञान व आत्मज्ञान यांचा सुरेख संगम तिच्यात आहे.
  ३) मानस शास्त्र, परामानस शास्त्र व अध्यात्म शास्त्र यांचा सुरेख संगम आहे.
  ४) जीवनाभिमुख, राष्ट्राभिमुख, समाजाभिमुख, सर्व भूत हित साधणारे, सर्वंकष, सर्वगामी, मूलगामी, अखिल मानवजातीचा साकल्याने विचार करणारे आहे.
  ५) दैव वाद, आदर्श वाद, भोग वाद/त्याग वाद यांना बाद करून वास्तव वाद, प्रयत्न वाद व विकास वाद यांचा पुरस्कार करणारे आहे.
  ६) सुखाला मारक अशा अज्ञान, अहंकार व अंध श्रध्दा यांना छेद देऊन निसर्ग नियमांशी सुसंगत जीवन जगण्याची कला व शास्त्र यांची अभिनव मांडणी जीवनविद्येत आहे.
  ७) मानवी जीवन सुखी करणाऱ्या महत्त्वाच्या संकल्पनांची निःसंदिग्ध, सुस्पष्ट व शास्त्र शुध्द मांडणी-परमेश्वर, धर्म, संस्कृती, नियती, पाप-पुण्य, मन, शरीर व त्या  अनुषंगाने मानवी जीवन सुखी करण्याहेतू अनेक अभिनव सिध्दांतांचा शोध व बोध.
  ८) Preventive rather than curative, proactive than reactive;
  ९) संसार -परमार्थ, देह-देव, ईश्वर-ऐश्वर्य, काम-नाम, उत्कर्ष-उन्नती, कला-शास्त्र या सर्वाचा साकल्याने विचार व जीवनासाठी कसे मिळवायचे यांचे विज्ञाननिष्ठ मार्गदर्शन,
  १०)स्त्रियांना सन्मानाचे स्थान व "चूल आणि मूल"  या विषयाचे महत्त्व समजावले;
  ११)सच्चिदानंदस्वरूप चैतन्यशक्तीचा खोल अभ्यास व विवेचन आणि तिचे जीवनासाठीचा Relevance and importance समजावले, पटवून दिले.
  १२) शतकानुशतके न सुटलेल्या अनेक प्रश्नांना शास्त्रशुध्द उत्तरे, पारंपारिक ज्ञानाचाच फक्त स्वीकार व अज्ञानाचा त्याग उदा. माणसाचा जन्म कशासाठी?
      इतिहासाची पुनरावृत्ती का होते इ.

      विस्तारभयास्तव जीवनविद्येचे अभिनव सिध्दांत इथे सांगू इच्छित नाही. पण असे हे जीवनविद्येचे वेगळेपण खऱ्या कार्यकर्त्याला सतत जाणवत असते.
श्री. सदगुरू सांगतात, "मरावे परि कार्यरूपी उरावे" , तोच खरा कार्यकर्ता "जो दुसरे कार्यकर्ते तयार करतो तो"-विश्वनाथ कामत, जीवनविद्येचा हा खरा कार्यकर्ता. काही मिळावे म्हणून नाही तर बरेच काही चांगले मिळावे म्हणून सवयीने जीवनविद्येचे कार्य करीत असतो.श्री. सदगुरूंकडे त्याचे एकच मागणे असते-"श्री. सदगुरू तुम्ही सांगता ना जीवनाच्या अंगाने आपण अमर आहोत. मग प्रत्येक जन्मात यापुढे तुमचेच कार्य करण्यासाठी जन्माला येऊ आणि कार्य करीत करीत देह ठेऊ." अशा कार्यकर्त्यांना बघून सहजोद्गार निघतात.-"नामधारक पैमय झाले त्यांची वंदीन मी पाऊले" असो.

    तुम्ही कोण होणार? या परंपरागत प्रश्नाचे उत्तर आता बदलावे लागेल. नुसते "मी इंजीनीयर होणार"  , "मी डॉक्टर होणार", "मी मोठा मॅनेजर होणार" , "मी यशस्वी खेळाडू होणार" इ. उत्तरे न देता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही समाजोपयोगी क्षेत्रात जा व जे व्हायचे ते व्हा. पण जीवनविद्येचा कार्यकर्ता झालाच पाहिजे नाहीतर आपण सुखी होणे शक्य नाही.   
« Last Edit: September 13, 2007, 09:13:31 PM by dr.nutanpol » Report to moderator   Logged

Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu!
May Divinity Within All get bloomed!
May God Bless all!
Vaibhav Nimbalkar
Senior Contributor
***
Offline Offline

Gender: Male
Posts: 115


Viththal Viththal...


« Reply #2 on: September 16, 2007, 08:45:01 PM »

Hatz off to u for this article!
This is my personal favourite one!! I get motivated by this all the time whenever I read this article...

My most favourite sentence in this exquisite article is-

"एका वाक्यात सांगायचे झाले तर अशा अलौकिक कार्यकर्त्यांचा रक्तगट A+, B+, O+ वगैरे नसून "श्री. सदगुरू" च असतो."

Thanx again for referring!
Report to moderator   Logged

Viththal Viththal....
May GOD bless all...Cheesy
Pages: [1]   Go Up
  Print  
 
Jump to:  

Powered by MySQL Powered by PHP Powered by SMF 1.1.14 | SMF © 2006-2011, Simple Machines LLC Valid XHTML 1.0! Valid CSS!