जीवनविद्या दर्शन-
3) लक्ष-अलक्ष
जीवनात माणसाला यश किंवा अपयश मीळते त्याला प्रमुख कारण 'लक्ष' हे असते. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अभ्यासाची गरज असते. किंबहुना अभ्यासाला पर्याय नाही असे म्हनने रास्त होईल. अभ्यासाला जितके महत्व आहे त्याच्यापेक्षा अभ्यासात लक्ष असणे सहस्त्रपटीनै महत्वाचे असते. ज्याचे अभ्यासावरुन लक्ष उड़ते , ते उडानटप्पू झाल्याशिवाय रहात नाहीत. प्रपंचात अभ्यासाची निरनिराळी क्षेत्रे असतात, त्याप्रमाणे परमार्थाच्या क्षेत्रात सुदृदा विशेष प्रकारचा अभ्यास आवश्यक असून साधकाला अलक्षाचे ठिकाणी लक्ष स्थिर करावयाचे असते. थोडक्यात प्रपंच असो किंवा परमार्थ असो, दोन्ही ठिकाणी अभ्यास आवश्यक असून अभ्यासात लक्ष स्थिर करता येणे नितांत आवश्यक असते.
1) जप किती केला यापेक्षा जपात किती लक्ष होते याला अधिक महत्व आहे, त्याप्रमाणे जपात किती लक्ष होते त्यापेक्षा जप करताना अलक्षकडे किती लक्ष होते याला सर्वात अधिक महत्व आहे.
2) स्वरूपी दक्ष राहुन प्रभु चरणाभोवती लक्ष फिरवित ठेवणे म्हणजे प्रदक्षीणा.
3) अलक्षावरील लक्ष ढळले की लक्षावधी विचार, विकार व् आकार लक्षात येऊ लागतात.
4) अलक्षाचे ठायी लक्ष स्थिर करणारा साधक " पहाता पहाता " लक्ष्मीपति होतो.
5) नामस्मरणात दक्ष राहून मनावर लक्ष ठेवल्याने अलक्ष सस्वरूप लक्षात येवू लागते.
6) जे प्राप्त आहे त्याकडे दुर्लक्ष करण्याने व जे प्राप्त नाही त्यावर लक्ष केन्द्रीभूत केल्याने माणसाला " सुख पहाता जवा पाडे दुख पर्वताएवढे " अशी अनुभूति प्राप्त होते.
7) अचूक शरसंधान करणारा धनुर्धर लक्ष्याचे सहज लक्ष्य साधतो, त्याप्रमाणे अखंड स्वरूपानुसंधान करणारा नामधारक ' अलख निरंजन ' या अलक्षाचे लक्ष्य साध्य करतो.

आपले लक्ष "मी" वर स्थिर होते तेव्हाच जीवनात खरी लक्ष्मी प्रगट होते.
9) नामस्मरणात लक्ष असेल तरच अलक्षाचे लक्ष करता येईल.
10) मनावर लक्ष ठेवले तर ते विरते व दुर्लक्ष केले तर ते फुगते.