Jeevanvidya Discussion Forums
February 04, 2012, 09:38:10 AM *
Welcome, Guest. Please login or register.

Login with username, password and session length
News: Note: New user registration is Enable till 15 Aug 2011
 
  Back to Website   Home   Help Search Login Register  
Pages: 1 [2] 3   Go Down
  Print  
Author Topic: अखंड नामस्मरण...!!!  (Read 6710 times)
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 308


« Reply #15 on: September 22, 2009, 01:12:09 PM »

सर्वांना नमस्कार,

यंत्रवत जप व स्वयंचलित जप यात संबंध जरुर आहे पण ते समानार्थी शब्द नाहीत.  याबाबत माझी मते मी सवडीने मांडीन.  कारण मी सद्या एका वेगळ्याच विचारात गुंतलो आहे व ते विचार शब्दबध्द करणे खूप अवघड जात आहे.  असो.

यंत्रवत जपाचा मोठा कालखंड असतो हे वाचून कोणीतरी नर्व्हस होण्याची शक्यता आहे असे वाटल्याने या यंत्रवत जपाचा टप्पा मानवाच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा, भाग्याचा तसेच उत्कर्षाचा कसा असतो हे मांडण्याचा सद्या प्रयत्न करत आहे.  संसारी माणसाला तर या कालखंडाची नितांत आवश्यकता असते असे माझे मत आहे.  या बाबतच्या चर्चेच्या निमित्ताने या कालखंडाबद्दल आत्मियता वाटू लागून, साधनेत विलक्षण रस निर्माण होण्याची शक्यता आहे असे मला उगीचच वाटू लागल्याने हा प्रयत्न करत आहे.  मात्र याला थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे.  असो.

सर्वांना नमस्कार.
Report to moderator   Logged
mk
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 543


साधनेने प्राप्त सिद्धी ही साध्य नाही साधन 


« Reply #16 on: September 23, 2009, 05:42:30 AM »

vcavc_
शामजी नमस्ते.

हे विवेचन खूपच उपयोगी ठरेल.

धन्यवाद.

मिलिंद खाडिलकर
Report to moderator   Logged

या लिखांणात व्यक्त झालेल्या मतांशी लेखक सहमत असेलच असे नाही.

This content does not necessarily represent the views of the author.
omkar
Junior Contributor
**
Offline Offline

Posts: 86


Read "Many Lifes Many Master" Brian L. Weiss


« Reply #17 on: September 23, 2009, 06:46:15 PM »

Thanks Sham kaka & others for the replies
I am personly trying out the method you have suggested


Omkar

May God bless with Akhand Sadgurukrupa & Effortless Namsmaran
Report to moderator   Logged

I am vary Happy & in deepest ( bottom hearth) Gratitude to god for blessing "every body be with akhand sadgurukrupa & effortless namsmaran"
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 308


« Reply #18 on: September 25, 2009, 04:30:44 PM »

सर्वांना नमस्कार,

ऊर्जा निर्मीतीच्या प्रकारात सजीवांची उर्जानिर्मीती प्रक्रिया ही सर्वश्रेष्ठ समजली जाते.  अन्न, पाणी व श्वसनातील प्राणवायू यांचा पुरवढा शरीरातील प्रत्येक पेशीला रक्ताद्वारे करण्याची ही सर्व प्रक्रीया अत्यंत आश्चर्यकारक आहे.  मानवाच्या मेंदूचे वजन व उर्वरित शरीराचे वजन यांचे गुणोत्तर १:४० असे असले तरी आपण श्वसनावाटे जो प्राणवायू घेतो त्यातील २५ टक्के प्राणवायूचा पुरवढा हा मेंदूला होत असतो.  आणि हा पुरवढा मेंदूला सतत व्हावा यासाठी एकूण रक्ताभिसरणातील २० टक्के रक्ताभिसरण मेंदूला होत असते.  साधारणत: एका दिवसाला सात टन इतका रक्तपुरवढा मेंदूला केला जात असतो!!! 

विचार करणे ह्या प्रक्रियेला उर्जा लागते हे लक्षात यावे यासाठी वरील माहिती दिली आहे.  म्हणजे मेंदूला पुरवली जाणारी सर्व उर्जा ही विचारांसाठी वापरली जाते असे यातून मला काही सुचवावयाचे नाही.  पण त्याचबरोबर आपल्याला हेही लक्षात ठेवावयाला लागते की, मानवाप्रमाणेच इतर प्राण्यांनाही मेंदू असतो व "विचार करणे" हा भाग वगळता मेंदूची कार्ये साधारणत: सारखीच असतात.  फक्त मनुष्यप्राणी प्रगत विचार करू शकतो.  इतकेच नव्हे तर या एका गोष्टीमुळे तो सर्वश्रेष्ठ प्राणी झाला आहे.  विचार करणे हे मानवी मेंदूचे किती महत्वाचे कार्य आहे हे यावरून लक्षात येऊ शकेल.  या सगळ्या विवेचनावरून "विचार करणे" या महत्वाच्या कार्याला उर्जेची किती जरुरी भासत असेल हयाचा थोडाफार अंदाज आपल्याला करता येऊ शकेल.

विचार करायला उर्जा लागते हे आणखी एका पध्दतीने समजावून घेता येईल.  समजा एखाद्या सुट्टीच्या दिवशी जेवणासाठी एखादा विशेष आवडीचा पदार्थ केलेला असेल तर त्या दिवशी आपण त्या पदार्थावर जोरदार ताव मारतो.  साहजिकच अन्नपचनासाठी जास्तीच्या उर्जेची जरुरी भासू लागते.  नविन उर्जा तर ताबडतोब निर्माण करता येत नसल्याने एकच पर्याय शिल्लक राहातो.  इतर अवयवांचा होणारा रक्तपुरवढा कमी करणे व ही वाचवलेली उर्जा पचनासाठी वापरणे.  आपल्याला झोप येते व झोपेत विचार थांबतात.  याप्रकारे उर्जा वाचवणे व वाचविलेली उर्जा पचनसंस्थेसाठी वापरणे यासाठीच हा खटाटोप केला जातो.

आता आपण जरा दुसर्‍या पध्दतीने विचार करु.  समजा दोन मित्र १ तास गप्पा मारत आहेत.  पण त्यातील जर एकाने गप्पांमधे विशेष आत्मियता दाखवली नाही किंवा आपल्यामुळे विषय जास्ती वाढणार नाही अशी काळजी घेतली तर काय होईल?  त्यांच्या गप्पा ५-१० मिनिटातच संपुष्टात येतील.  यंत्रवत जपामुळे अगदी तसेच काहीतरी घडायला सुरवात होते.  तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार मधे सद्‌गुरुंनी बहिर्मन व अंतर्मन या संबंधात असे म्हटले आहे की, बहिर्मन व अंतर्मन ह्या दोन विणकामाच्या सुया आहेत.  एक टाका बहिर्मन घालते तर दुसरा टाका अंतर्मन घालत असते व अशारितीने आपल्या जीवनाचे वस्त्र विणले जात असते.  पण अंतर्मन नामस्मरण अथवा विश्वप्रार्थेनेत गुंतल्यामुळे बहिर्मन जर अनावश्यक विषयाबद्दल टाके घालू लागले तर त्यावर अंतर्मन नवीन टाका घालायचे थांबू लागते.  याचे कारण एकच असते.  ते म्हणजे फावल्या वेळेत अनावश्यक काही तरी करण्यापेक्षा नामस्मरण अथवा विश्वप्रार्थना करायची बहिर्मनाने अंतर्मनाला लावलेली सवय होय.  खूपदा असेही घडू लागते. की,  बहिर्मनाने घातलेल्या टाक्याला उत्तर म्हणून अंतर्मन पण एक टाका घालते व तो अशा प्रकारचा असण्याची शक्यता जास्त असते.  "जाऊ दे ना. काय करायच आहे आपल्याला.  त्यापेक्षा नामस्मरण केलेले काय वाईट"    हे सर्व एका रात्रीत घडत नाही हे मान्य पण प्रक्रिया सुरु होते व उत्तरोत्तर वाढत जाते हे नक्की.  नामस्मरण व विश्वप्रार्थना करू लागल्यावर मनातील विचार कमी होऊ लागतात असे म्हणतात त्याचा उगम यामधे असतो.

आता एका नविन पध्दतीने विचार करू.  समजा एखाद्याला धनसंचय करावयाचा असेल तर त्याने काय केले पाहिजे?  अशा माणसापुढे दोनच पर्याय असतात.  अर्थप्राप्तीचे नविन मार्ग शोधून काढणे हा पहिला मार्ग.  तर अनावश्यक खर्चाला फाटा देणे हा दुसरा मार्ग होय.  यंत्रवत नामस्मरणाने अगदी असेच थोडेसे घडू लागते.  आत्तापर्यंत आपण पाहिले की, विचारांना उर्जा लागते.  तसेच हेही समजावून घेतले की, यंत्रवत नामस्मरणाने अनावश्यक विचार कमी होऊ लागतात.  या दोन्हीतून एकच निष्कर्ष निघतो तो म्हणजे आपली उर्जा वाचू लागते.  अनावश्यक गोष्टींसाठी खर्च होणारी उर्जा वाचवणे म्हणजेच शक्तीसंचय होय.  दिवसाकाठी ५-६ तास फावल्यावेळेत नामस्मरण अथवा विश्वप्रार्थना म्हणजे केवढा मोठ्या प्रमाणावर शक्तीसंचय होत असेल याची कल्पना करा.  यंत्रवत नामस्मरण म्हणजे काही फालतू गोष्ट नाही तर ती शक्तीसंचयाची अवस्था आहे.  उगीच नाही सद्‌गुरू म्हणत, "भगवत्नाम अथवा विश्वप्रार्थना काही वाटेवर पडलेली नाही की कोणीही उढावे व ती म्हणावी.  ती मुखात येण्यासाठी गाठी पुण्यच पाहिजे."

तसेच धनसंचय करण्यासाठी नवीन अर्थप्राप्तीचे मार्ग शोधून काठणे शक्य असले तरी उर्जा वाढविण्यासाठी आपण जास्तीचे प्रयत्न करू शकत नाही हेही लक्षात ठेवले पाहिजे.  मला जास्त विचार करावयाचा आहे यास्तव मी माझे खाणे दुप्पट करतो असे म्हणता येत नाही.  खाणे वाढवले तर विचार वाढायचे राहोत, झोप आल्याने आहेत ते विचार करण्याचीसुध्दा शक्यता दुरावेल.  तसेच जास्त विचार करण्यासाठी मी दुप्पट श्वसन करणार आहे असे कोणी म्हणू लागला तर त्याला कोणीही वेड्यातच काढेल.  म्हणजे विचारांसाठी नव्याने उर्जानिर्मीती करण्याची शक्यता किती कमी आहे हे लक्षात येऊ शकेल.

आता मी एक वेगळाच मुद्दा मांडणार आहे.  समजा एक फुगा आहे व त्यात ठासून पाणी भरलेले आहे.  तसेच या फुग्याला असंख्य भोके आहेत असे समजू.  असे असेल तर काय होईल?  प्रत्येक भोकातून पाणी बाहेर यायला लागेल.  जर आपण एक एक भोक बुजवायला लागलो तर काय होईल?  फुग्यातील पाण्याचा साठा जास्त काळ तर टिकेलच शिवाय उरलेल्या भोकातून बाहेर येणार्‍या पाण्याचा जोर काही प्रमाणात वाढेल.  जर समजा एकच भोक शिल्लक ठेवून बाकी सर्व भोके बुजवली तर काय होईल?  फुग्यातील पाण्याचा साठा सर्वात जास्त काळ टिकेल तसेच या एका भोकातून खूपच वेगाने तसेच जास्त दाबाने पाणी बाहेर येऊ लागेल. 

यंत्रवत नामस्मरणाने असेच थोडेसे घडायला लागते.  एका बाजूने शक्तीसंचय होऊ लागतो तर दुसर्‍या बाजूने अनावश्यक विचार ज्यातून बाहेर पडत असतात ती भोके  बुजवली जाऊ लागतात.  तसेच नव्याने अनावश्यक भोके पडणेही बंद होते.  या सर्वांचा परिणाम असा होतो की,  ज्यावेळेस आवश्यक अथवा महत्वाच्या बाबतीत विचार करणे आवश्यक आहे तेथे विचार करण्यासाठी भरपूर उर्जाही शिल्लक असते व या उर्जेचा जोर अथवा दाबही वाढलेला असतो.  याचा परिणाम असा होतो की एखाद्या गोष्टीत खोलवर जाऊन विचार करणे शक्य होऊ लागते व या प्रक्रियेला लागणारा वेळही वाचायला लागतो.  अर्थात यंत्रवत नामस्मरण करणार्‍या माणसाच्या ते लक्षात येत नाही इतके सहजपणे त्याच्याकडून हे घडत असते.  मात्र लोक म्हणू लागतात की, या माणसाची आकलनशक्ती चांगली आहे.  एखाद्या गोष्टीचा अनेक अंगाने विचार करण्यासाठी बराच काळ सातत्याने विचार करायला लागतो पण उर्जेचा साठा शिल्लक राहाण्याचा अवधी वाढलेला असल्याने हे सातत्य टिकवणे सहज जमू लागते.  भोके बुजवल्यामुळे उर्जेचा साठा शिल्लक राहातो आहे व त्यामुळे एखाद्या गोष्टीवर न थकता आपण विचार करू शकत आहोत हे त्या माणसाच्या जरी लक्षात येत नसले तरी लोक मात्र म्हणायला लागतात की या माणसाची विश्लेषणात्मक बुध्दी चांगली आहे.  हा माणूस सांगोपांग विचार करतो.  किंवा या माणसाचे बोलणे अभ्यासपूर्ण असते !!!

शक्तीसंचय ही एक अशी गोष्ट आहे की, त्यामुळे दैनंदीन जीवनात माणूस जे वैचारिक कार्य करत असतो त्या कार्याची गुणवत्ता वाढीस लागते.  इतकेच नव्हे तर इतरांशी तुलना करता जास्त वैचारिक काम करण्याची त्याची क्षमताही वाढीस लागते.  यंत्रवत नामस्मरणाने हे सगळे होत आहे हे त्याच्या गावीही नसते.  इतरांना मात्र ते जाणवत असते फक्त लोक ते बोलून दाखवतील असे नाही.  या सर्वांचा परिणाम त्याच्या उत्कर्ष होण्यात न झाला तरच नवल.  अशा माणसाबद्दल इतरांना विश्वास वाटू लागल्याने नवनवीन संधी त्याच्याकडे चालून यायला लागतात ते वेगळेच.

उर्जा व आळस एकत्र नांदत नाहीत.  अशी बरीच माणसे असतात की ज्यांच्याकडे अनेक सुप्त गुण असतात.  पण निव्वळ आळसामुळे या गुणांना अभिव्यक्त होण्याची संधीच मिळत नाही.  शक्तिसंचय होऊ लागल्यावर ही उर्जा त्या माणसाला कार्यरत करते.  ही खरोखरच अनुभवण्याची गोष्ट आहे.

तर कित्येक जण हुषार असतात.  त्यांच्यात अनेक सुप्त गुण असतात.  या गुणांना अभिव्यक्त होण्याची संधी प्राप्त होत असूनही केवळ सातत्य नसल्याने अशा माणसांच्या हातून काहीएक घडू शकत नाही.  त्याच्या हातून घडले तर एकच घडते.  ते म्हणजे "एक ना धड भाराभर चिंध्या" शक्तीसंचयामुळे एखादी गोष्ट सातत्याने करणे हा एक मोठा गुण या माणसात येऊ लागतो.  फावल्यावेळेत का होईना तसेच यंत्रवत का असेना पण दिवसाकाठी ५-६ तास नामस्मरण बरीच वर्षे करत राहाणारा माणूस म्हणजे सातत्याचा मेरुमणीच नव्हे काय?  सातत्य म्हणजे सतत असणे.   परमेश्वराच्या असिपदाचाच हा भाग आहे.  अशा माणसाचा उत्कर्ष नाही होणार तर काय होणार?

बरेच काही सांगता येण्यासारखे आहे पण मला वाटते ह्या निव्वळ सांगण्याच्या अथवा वाचायच्या गोष्टी नसून अनुभवण्याच्या गोष्टी आहेत.  या सगळ्याचा सारांश असा की एकाबाजूने यंत्रवत नामस्मरणाचा हा कालखंड संसारातील अडीअडचणी, आव्हाने यांचा यशस्वी मुकाबला करून संसार चांग करतो तर दुसर्‍या बाजूने दुसर्‍या टप्यात सुरू होणार्‍या परमार्थासाठी भक्कम पाया तयार करतो.  असो.

शेवटी एक मुद्दा मांडून थांबतो.  यंत्रवत जप होणे म्हणजे जपात लक्ष नसणे हे आपण पाहिले.  ह्या मधे पारंगत होणे म्हणजे दिवसभरात ५-६ तास फावल्यावेळेत जप करता येणे हेही पाहिले.  हा जप   यंत्रवत होत असेल तरी वाईट वाटून घ्यायची काहीही जरुरी नाही हेही आपण पाहिले.  यानंतरच्या   दुसर्‍या टप्पात लक्ष ठेवणे यालाच जास्त महत्व असते हेही समजले.  तरीही येथे हे नमूद करायलाच पाहिजे की विषय समजावा म्हणून असे दोन टप्पे आपण कल्पिलेले आहेत.  प्रत्यक्षात हे दोन्ही टप्पे एकमेकांत मिसळलेलेच असतात फक्त त्याचे प्रमाण बदलत असते इतकेच.  हे सर्व आपल्या लक्षात येत नाही हीच खरी अडचण आहे.  हे दोनही टप्पे एकमेकांत मिसळलेले कसे असतात, हे जर वेळ मिळाला, नीट शब्दात मांडणे जमले तर याबाबत लिहिण्याचा प्रयत्न करेन.

जगदंबार्पणमस्तु

सर्वांना नमस्कार.

Report to moderator   Logged
mk
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 543


साधनेने प्राप्त सिद्धी ही साध्य नाही साधन 


« Reply #19 on: September 25, 2009, 08:57:40 PM »

vcavc_,
शामजी धन्यवाद.

एक छोटासा प्रश्न, जो सुटल्यास मला आपल्या विवेचनाच्या इतर भागाची संगती लागेलः



आपण जेव्हा
QUOTE
पण अंतर्मन नामस्मरण अथवा विश्वप्रार्थेनेत गुंतल्यामुळे बहिर्मन जर अनावश्यक विषयाबद्दल टाके घालू लागले तर त्यावर अंतर्मन नवीन टाका घालायचे थांबू लागते. याचे कारण एकच असते.  ते म्हणजे फावल्या वेळेत अनावश्यक काही तरी करण्यापेक्षा नामस्मरण अथवा विश्वप्रार्थना करायची बहिर्मनाने अंतर्मनाला लावलेली सवय होय.  खूपदा असेही घडू लागते. की,  बहिर्मनाने घातलेल्या टाक्याला उत्तर म्हणून अंतर्मन पण एक टाका घालते व तो अशा प्रकारचा असण्याची शक्यता जास्त असते.  "जाऊ दे ना. काय करायच आहे आपल्याला.  त्यापेक्षा नामस्मरण केलेले काय वाईट"
UNQUOTE
असे म्हणता तेव्हा आपण अंतर्मनाला आवश्यक-अनावश्यक-विवेकाची कुवत गृहित धरता आहात असे वाटते.  "JV नुसार अंतर्मन हे अक्कलशून्य, विवेकशून्य यंत्र आहे (त्याला पै महाराजांनी बरेचदा computerची उपमा दिलेली आहे)" असा माझा जो समज झाला आहे तो चुकीचा आहे का?

पुनः, धन्यवाद.

मिलिंद खाडिलकर


Report to moderator   Logged

या लिखांणात व्यक्त झालेल्या मतांशी लेखक सहमत असेलच असे नाही.

This content does not necessarily represent the views of the author.
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 308


« Reply #20 on: September 25, 2009, 09:38:10 PM »

सर्वांना नमस्कार,

अंतर्मन हे नेहमीच बहिर्मनाच्या दबावाखाली राहात असते.  ते अक्कलशून्य असते हे जसे खरे आहे त्याचप्रमाणे बहिर्मनाने जे सांगितले आहे त्याप्रमाणेच ते वागते हेही तेवढेच खरे आहे.  आणि म्हणूनच "बहिर्मनाने अंतर्मनाला लावलेली सवय" हे शब्दप्रयोग केलेले आहेत.

यासाठी फावल्या वेळेत नामस्मरण करायची सुरवात कशी होते त्याचा विचार लक्षात घ्यायला लागेल.  "जाऊ दे ना.  काय करायच आहे आपल्याला.  त्यापेक्षा नामस्मरण केलेले काय वाईट"  अशा आशयाचा विचार कधितरी बहिर्मनात उगम पावतो.  व आपण नामस्मरण सुरू करतो.  फावल्या वेळेत नामस्मरणाची ही पहिलीच घटना असते.  याचीच पुनरावृत्ती वारंवार झाल्यावर मात्र याच पध्दतीने अंतर्मनही वागू लागते.  सुरवात बहिर्मन करून देते व त्याची सवय नंतर अंतर्मनाला लागते.  थोडक्यात फावला वेळ म्हणजे नक्की काय हे प्रथम बहिर्मन ठरविते.  व त्याप्रमाणे बहिर्मन ही सवय अंतर्मनाला जाणीवपूर्वक लावते.  त्यानंतर काय होते ते मी माझ्या पोस्टमधे लिहिले आहे.

मला वाटते हे जर लक्षात घेतले तर माझ्या पोस्टमधून अंतर्मन अक्कलवान असते असे काही ध्वनित होते आहे असे वाटणार नाही.

सर्वांना नमस्कार.
Report to moderator   Logged
mk
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 543


साधनेने प्राप्त सिद्धी ही साध्य नाही साधन 


« Reply #21 on: September 25, 2009, 10:18:26 PM »

Namonamah,
Shamjee Namaste,
Thanks for the apt clarification. But I still feel you are expecting too much from the antarman, in terms of JV. I do not think that the antarman (as conceptualised by JV) can disobey or twist bahirman's commands. It is for the bahirman to "train itself" to not give improper commands to the antarman.

Also, when you say
QUOTE
फावल्यावेळेत का होईना तसेच यंत्रवत का असेना
UNQUOTE
do you intend to suggest that the above are compromises to some ideal situation? But (again my opinion) does not JV say that VP is best when done in spare time (faavlyaa velet)  and as a chant (which is yantravat)?

Thanks and regards
Milind Khadilkar
Report to moderator   Logged

या लिखांणात व्यक्त झालेल्या मतांशी लेखक सहमत असेलच असे नाही.

This content does not necessarily represent the views of the author.
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 308


« Reply #22 on: September 25, 2009, 11:03:53 PM »

सर्वांना नमस्कार,

But I still feel you are expecting too much from the antarman, in terms of JV. I do not think that the antarman (as conceptualised by JV) can disobey or twist bahirman's commands. It is for the bahirman to "train itself" to not give improper commands to the antarman.
मला तुम्ही काय म्हणत आहात ते काहीसुध्दा कळले नाही. जरा स्पष्ट करा.

do you intend to suggest that the above are compromises to some ideal situation? But (again my opinion) does not JV say that VP is best when done in spare time (faavlyaa velet)  and as a chant (which is yantravat)?
मी जे दोन टप्पे सांगितले आहेत ते विषय नीट कळावा म्हणून.  नामस्मरणात अथवा विश्वप्रार्थनेत लक्ष असेल तर ताबडतोब त्यातील लक्ष काढून घेऊन ती विश्वप्रार्थना अथवा नामस्मरण यंत्रवत सुरु केले पाहिजे असा अर्थ माझ्या पोस्टमधून सूचित होतो आहे असे काही तुम्हाला म्हणायचे आहे का?  तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे ते अजूनही माझ्या लक्षात येत नाहीय्ये.  "my opinion" ह्या शब्दाचा अर्थ जरा स्पष्ट कराल का.

सर्वांना नमस्कार.

सर्वाना नमस्कार.
Report to moderator   Logged
mk
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 543


साधनेने प्राप्त सिद्धी ही साध्य नाही साधन 


« Reply #23 on: September 26, 2009, 12:12:13 AM »

vcavc_

शामजी धन्यवाद व नमस्ते,

"my opinion" चा येथे अर्थ "JV या विषयी काय सांगते यासंबंधीचे माझे आकलन"

1.
But I still feel you are expecting too much from the antarman, in terms of JV. I do not think that the antarman (as conceptualised by JV) can disobey or twist bahirman's commands. It is for the bahirman to "train itself" to not give improper commands to the antarman.

आपल्या चपखल स्पष्टीकरणानंतर देखील मला असे वाटते की आपण (JV ने कल्पिलेल्या) अंतर्मनाकडून फार जास्त अपेक्षा ठेवीत आहात. मला जे आकलन झाले आहे त्यानुसार बहिर्मनाच्या सूचनांचा अधिक्षेप, अवमान वा अपालन करण्याची अंतर्मनाची कुवत नाही,  प्राज्ञा तर यंत्राला असूच शकत नाही. अंतर्मनाला अयोग्य सूचना न जाऊ देण्याची संपूर्ण जबाबदारी बहिर्मनाची आहे व तशी शिस्त बहिर्मनाने अंगी बाणवली पाहिजे.

2
"फावल्यावेळेत का होईना तसेच यंत्रवत का असेना" यासंबंधात मी लिहिलेः
do you intend to suggest that the above are compromises to some ideal situation? But (again my opinion) does not JV say that VP is best when done in spare time (faavlyaa velet)  and as a chant (which is yantravat)?

"फावल्यावेळेत का होईना तसेच यंत्रवत का असेना" असे जेव्हा आपण लिहिता तेव्हा ही एक तडजोड आहे असे आपणास सुचवावयाचे आहे का?
मला जे आकलन झाले आहे त्यानुसार VP तशीच असावी, "फावल्यावेळेत व यंत्रवत" हीच सर्वोत्तम असे JV चे म्हणणे नव्हे का?

--------------------------------------
शब्दयोजनेत वा वाक्यरचनेत (अंग्रजी वा मराठी) त्रुटी असल्यास मोठ्या मनाने क्षमा करावी.

धन्यवाद.

मिलिंद खाडिलकर
Report to moderator   Logged

या लिखांणात व्यक्त झालेल्या मतांशी लेखक सहमत असेलच असे नाही.

This content does not necessarily represent the views of the author.
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 308


« Reply #24 on: September 26, 2009, 02:48:20 PM »

सर्वांना नमस्कार,

"my opinion" चा येथे अर्थ "JV या विषयी काय सांगते यासंबंधीचे माझे आकलन"

मला वाटते "तुम्हाला झालेले आकलन" या एकाच गोष्टीवरती तुमचे मुद्दे आधारित आहेत.  म्हणून "आकलन" या शब्दावरच जास्त भर देत आहे.
आपल्याला जे आकलन होते ते साधारणत: दोन पध्दतीने होते.  पहिला प्रकार म्हणजे ग्रंथ, सी.डी., प्रवचने यांचा अर्थ तर्काने जाणणे होय.  मात्र इथे हे गृहित धरले आहे की, त्याने सद्‌गुरूंचे सर्व ग्रंथ हे वाचलेले आहेत तसेच प्रवचनामधील सत्‌ चित्‌ आनंद यावरील २८ सीडी ऐकलेल्या आहेत.  दुसरा प्रकार म्हणजे प्रत्यक्ष अनुभव घेऊन जाणणे.  या दोन्ही पध्दतींचा समन्वय असेल तरच खरे जाणणे जमू शकते.  याचे कारण असे सांगता येऊ शकेल.  जेव्हा आपण तर्काने जाणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या दृष्टीकोनाला खूप महत्व असते.  जसा आपला दृष्टीकोन असतो त्याप्रमाणे आपला तर्क असतो.  म्हणजे आपल्या तर्क करण्याच्या पध्दतीवर आपल्या  दृष्टीकोनाचा प्रभाव असतो.  तर अनुभव ही अशी गोष्ट आहे की, ती आपला दृष्टीकोनच बदलते.  अर्थातच प्राप्त झालेला हा नवीन दृष्टीकोन (अनुभवसिध्द दृष्टीकोन) आपल्याला खरा अर्थ लक्षात आणून देते.   या उलट योग्य दृष्टीकोन नसेल तर ज्ञानाऐवजी विपरीत ज्ञानाची प्राप्ती होते.  सर्व संतांनी यास्तव प्रत्यक्ष उपासनेला महत्व दिलेले आहे. 

1.
But I still feel you are expecting too much from the antarman, in terms of JV.
आपल्या चपखल स्पष्टीकरणानंतर देखील मला असे वाटते की आपण (JV ने कल्पिलेल्या) अंतर्मनाकडून फार जास्त अपेक्षा ठेवीत आहात.

यातील टू मच बद्दल जरा स्पष्टीकरण कराल का?  एखादे उदाहरण देऊन स्पष्ट केले तर मला समजायला खूपच सोपे जाईल असे वाटते.

1.
I do not think that the antarman (as conceptualised by JV) can disobey or twist bahirman's commands.
मला जे आकलन झाले आहे त्यानुसार बहिर्मनाच्या सूचनांचा अधिक्षेप, अवमान वा अपालन करण्याची अंतर्मनाची कुवत नाही,  प्राज्ञा तर यंत्राला असूच शकत नाही.

वरील वाक्यांना छेद जाईल असे काही मी लिहिले आहे असे मला वाटत नाही.  तसे तुम्हाला वाटत असेल तर उदाहरण देऊन स्पष्ट करा.

It is for the bahirman to "train itself" to not give improper commands to the antarman.
अंतर्मनाला अयोग्य सूचना न जाऊ देण्याची संपूर्ण जबाबदारी बहिर्मनाची आहे व तशी शिस्त बहिर्मनाने अंगी बाणवली पाहिजे.

हेच तर आपल्याला साधायचे आहे.  सर्व उपासना पध्दतींचे हेच तर धेय्य असते.  हे धेय्य नामस्मरणाने अथवा विश्वप्रार्थनेच्या उपासनेने कसे साधायचे हेच तर मी लिहिले आहे.  तुम्ही हे वाक्य का लिहिले आहे त्याचे कारण अजूनही माझ्या लक्षात येत नाहीय्ये.  जरा स्पष्ट करा.

2
"फावल्यावेळेत का होईना तसेच यंत्रवत का असेना" यासंबंधात मी लिहिलेः
do you intend to suggest that the above are compromises to some ideal situation?
"फावल्यावेळेत का होईना तसेच यंत्रवत का असेना" असे जेव्हा आपण लिहिता तेव्हा ही एक तडजोड आहे असे आपणास सुचवावयाचे आहे का?

तडजोड या शब्दाचा वापर तुम्ही का केलाय ते लक्षात येत नाहीय्ये.  तडजोड करणे म्हणजे काहीतरी अयोग्य आहे असे तुम्हाला काही सुचवावयाचे आहे का?  तुमच्या शब्दांना ज्याचा आधार आहे तो आधार लक्षात घेण्याचा प्रयत्न करतोय पण अजून मला ते नीट जमत नाहीय्ये.  जरा मदत करा.

But (again my opinion) does not JV say that VP is best when done in spare time (faavlyaa velet)  and as a chant (which is yantravat)?
मला जे आकलन झाले आहे त्यानुसार VP तशीच असावी, "फावल्यावेळेत व यंत्रवत" हीच सर्वोत्तम असे JV चे म्हणणे नव्हे का?

याबाबतीत मीच अंधारात आहे.  मी तुम्हाला काय सांगू.  जीवनविद्येतील अधिकारी नामधारकच यावर प्रकाश टाकू शकतील.  वाट पाहाणे एवढेच आपल्या हातात आहे.  आणि मी तरी तेच करत राहाणार आहे.

सर्वांना नमस्कार
Report to moderator   Logged
omkar
Junior Contributor
**
Offline Offline

Posts: 86


Read "Many Lifes Many Master" Brian L. Weiss


« Reply #25 on: September 26, 2009, 11:34:42 PM »

Hello all

Satat namsmaran ha nantar nantar divya vichar rahto ka? [capable of generating divya vichar??]
ka natar ti savaych houn jate ani pravrutti pramane vichar chaluch rahtat.

Thanks All Bless All

Omkar

May God bless All with "Akhand Sadgurukrupa & Effortless Namsmaran"
 
Report to moderator   Logged

I am vary Happy & in deepest ( bottom hearth) Gratitude to god for blessing "every body be with akhand sadgurukrupa & effortless namsmaran"
Varsha
Senior Contributor
***
Offline Offline

Posts: 116


« Reply #26 on: September 27, 2009, 05:28:46 AM »

Hello Milindji,Omkarji,Devendraji aani Sham Kaka
Sarvana Namaskar.

Ha khup chan vishay tumhi charchesathi ghetla aahe.Sham kaka tumche posts nehmi vachavese wattat.
Mi Sadhnemadhe khup pudhe geleli Sadhak nahiye.Pan maza Anubhav mi mandnyacha prayatna karte.

Sadguruna pratyaksha bhetlyanantar Sadhnemadhe khup farak padto.Prarthana mhantana Aanand aani Shanti anubhavala yete.
Pan Prarthana mhantana DEVACHE(Maulinche) smaran have.Devachya smaranat kelelya Namasankirtananehi asach anubhav yeto.
Sagla jagach Sundar Watu Lagta.Sadguru mhantat tyapramane,'Manasthiti badla Paristhiti badlel' he kiti satya aahe yachi prachiti
yeu lagte.Sadgurun vishayichya premane dole bharun yetat,Kantha datun yeto.Manaspuja havi havishi watu lagte.

Prarthana yantrawat watu laglyavar mi Sadgurunchi VCD pahte kinva granth wachte.Etar namdharkanche anubhav vachte..mag
ajun chan prarthana /Namsankirtan hou lagte.

Kadhi kadhi prarthnecha counter gheun mojun prarthana karte,tyane aaplyakadun khup prarthana zalyacha aanand milto.
Ya Vishayavar Nutan Tai ,Subhash kaka yani ajun sangave ase watte.

Maulinchya krupene Sarvankadun kshana kshanala prarthana hovo!!
Report to moderator   Logged
mk
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 543


साधनेने प्राप्त सिद्धी ही साध्य नाही साधन 


« Reply #27 on: September 27, 2009, 11:26:54 AM »

vcavc_,
वर्षाजी नमस्ते.

आपले साधनेचे उत्कट (हा शब्द योग्य नसल्यास क्षमा करावी) अनुभव वाचून आनंद झाला. आपले अभिनंदन.

धन्यवाद.

मिलिंद खाडिलकर

ता. क. ः डा. नूतनजी, सुभाषजी, दीपक-जेव्हीएम् जी, गीतादातारजी बहुतेक फोरमला  विसरले असावेत.......
Report to moderator   Logged

या लिखांणात व्यक्त झालेल्या मतांशी लेखक सहमत असेलच असे नाही.

This content does not necessarily represent the views of the author.
mk
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 543


साधनेने प्राप्त सिद्धी ही साध्य नाही साधन 


« Reply #28 on: September 27, 2009, 12:10:24 PM »

vcavc_,

शामजी नमस्ते,

QUOTE
मला वाटते "तुम्हाला झालेले आकलन" या एकाच गोष्टीवरती तुमचे मुद्दे आधारित आहेत.
UNQUOTE

हे गृहीतक चुकीचे आहे. मी JVM चा प्रतिनिधी नाही हे दर्शविणे, माझ्या या विषयातल्या मर्यादा  दर्शविणे, यासाठी तो वाक्यांशप्रयोग होता. अर्थात् त्याचा अर्थ आपण कसा काढता यावर पूर्णपणे आपलाच अधिकार आहे हे मला मान्य आहे.

तरी आपले गृहीतक चुकीचे असेल तर आपले उत्तर वेगळे असेल का?

धन्यवाद.

मिलिंद खाडिलकर
Report to moderator   Logged

या लिखांणात व्यक्त झालेल्या मतांशी लेखक सहमत असेलच असे नाही.

This content does not necessarily represent the views of the author.
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 308


« Reply #29 on: September 27, 2009, 02:20:51 PM »

सर्वांना नमस्कार,

नमस्कार मिलिंद खाडीलकर,
मी माझी मते इतरांना पटावीत यासाठी कधी प्रयत्न करत नाही.  तर मला पटलेली मते मांडायचा प्रयत्न करतो.  मी पूर्वी कसा होतो माझ्यात कोणते दोष होते तसेच माझे विचार अथवा दृष्टीकोन कसा होता ते मला माहित आहे.  पण १९९० साली गुरुमंत्र घेतल्यावर फावल्यावेळेत नामस्मरण करण्याची लावून घेतलेली सवय व सद्‌गुरूंचा मधून मधून मिळणार सहवास व सेवा करण्याची मधून मधून मिळणारी संधी या जोरावर आलेले अनुभव, बदललेला दृष्टीकोन, आपसूक गळून पडलेले दोष मी प्रत्यक्ष अनुभलेय / अनुभवतोय.  हा झालेला बदल माझे निकटवर्तीयही मान्य करत आहेत.  म्हणजे हे सर्व माझ्या मनाचे खेळ नक्कीच नसणार याचीही खात्री पटलीय.  मला अजूनही खूप लांबचा पल्ला गाठायचाय याची जाणीव आहे.  किती जन्म लागणार आहेत मला माहित नाही.  पण त्याचा विचार मी करत नाही.  आपण योग्य मार्गावरून चाललो आहोत हे पटलेय.  फक्त आता काही झाले तरी रस्ता सोडायचा नाही यावर ठाम झालोय.  आज ना उद्या मुक्कामाला नक्कीच पोहोचणार असा विश्वास निर्माण झाला आहे.  असो.

मी या अगोदर जे लिहिले आहे त्यामागे एकच उद्देश आहे.  मी ज्या चुका केल्या व त्यामुळे माझे जे अपरिमीत नुकसान झाले ते इतरांचे होऊ नये.  माझे चुकीचे विचार, माझी चुकीची संगत तसेच माझ्या चुकीच्या अथवा अपुर्‍या माहितीच्या आधारावर आधारलेला दृष्टीकोन जो चुकीचा किंवा अर्धवट असूनही तो बरोबरच आहे असे समजल्यामुळे झालेले नुकसान विशेष करून वाया गेलेले आयुष्य हे मला माहितेय.  असे नुकसान कोणाचे होऊ नये ह्या एकमेव हेतूने मी लिहितोय.  अनुभव आला की, तो अनुभव आपल्या अगोदरच्या दृष्टीकोनातील जे योग्य आहे ते तसेच ठेवतो, अयोग्य असेल ते आपोआप गळून पडते व जे हिताचे आहे त्याचे वर्धन करतो व एक नवा परिपक्व दृष्टीकोन निर्माण होतो असा माझा अनुभव असेल तर त्याप्रमाणे लिहिणे इतकेच माझ्या हातात आहे व तेच मी करत आहे.

तरीही आणखी काही वेगळेच हेतू त्यामागे आहेत असे कोणाला म्हणायचे असेल तर तसे म्हणण्याचा त्याला पूर्ण अधिकार आहे.  कारण ते कर्मस्वातंत्र्य परमेश्वरानेच त्याला बहाल केलेले असते  हे मला मनापासून मान्य आहे.  मला असे ठामपणे वाटते की, मला आलेले अनुभव मला माझी गृहितके अथवा माझे दृष्टीकोन बदलू देणार नाहीत यास्तव आता तुम्हाला सांगण्यासारखे माझ्याकडे काही शिल्लक नाही हे मान्य करून थांबतो.

सर्वांना नमस्कार.
Report to moderator   Logged
Pages: 1 [2] 3   Go Up
  Print  
 
Jump to:  

Powered by MySQL Powered by PHP Powered by SMF 1.1.14 | SMF © 2006-2011, Simple Machines LLC Valid XHTML 1.0! Valid CSS!