dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 429
|
 |
« on: June 30, 2011, 03:34:13 PM » |
|
विश्वप्रार्थनेचे सामर्थ्य-
विश्वप्रार्थनेचे अनुभव अनेक लोकांनी आतापर्यंत लिहिले आहेत. त्यांनी त्यांच्या संकटसमयी अट्टाहासाने विश्वप्रार्थना सतत म्हणून कठीण परिस्थितीमधून आपली सुटका करून घेतली. मग इथे असा प्रश्न निर्माण होतो की जगातील अनेक माणसे विश्वप्रार्थना न म्हणता सुध्दा संकटातून सहीसलामत बाहेर पडतातच. ते कसे? तर याला उत्तर असे आहे की, पुण्याईच्या बळावर माणूस संकटातून बाहेर पडतो पण पुण्याईच्या अभावाने संकटात अडकून रहातो किंवा तसाच मरतो. विचार, आचार, उच्चार या मार्फत आपण पाप किंवा पुण्य निर्माण करतो. शुभ विचार, शुभ बोलणे आणि सत्कर्मे (चांगली कामे) केले असता आपल्याला पुण्य मिळते. तसे पुण्य मिळवण्याचे मार्ग अनेक आहेत.
सुखी जीवन जगण्यासाठी पुण्याईची आवश्यकता असते आणि ही पुण्याई त्या माणसाजवळ विश्वप्रार्थनेने मोठ्या प्रमाणावर साठवली जाते. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे दान करूनही पुण्य मिळते. उदाहरणार्थ-अन्नदान, वस्त्रदान, द्वव्यदान, रक्तदान, नेत्रदान, देहदान वगैरे.. यातील काही दान प्रकार तात्कालिक असतात. ते दान परत परत करावे लागते आणि त्यात आणखी एक असा धोका असतो की घेणारा याचक (भिकारी) होऊन जातो. तो देणाऱ्याकडे परत परत हात पसरतो. दुसरा धोका असा आहे की, देणाऱ्यास जर देण्याचा ?अहंकार? झाला तर कापूर जसा अग्निच्या सहवासात आल्यावर आपले अस्तित्व गमावतो अगदी तसेच देणारा आपली पुण्याई गमावतो. त्याचप्रमाणे हे सर्व करण्यासाठी पैसा, वेळ, कष्ट लागतात. इथे विश्वप्रार्थनेचे श्रेष्ठत्व सिध्द होते. विश्वप्रार्थना म्हणायला काही खर्च नाही, काही कष्ट नाहीत किंवा वेळेचा अपव्यय होत नाही कारण विश्वप्रार्थना हाताने काम करताना मनात म्हणायची असते. तिचा सुपरिणाम आणि अनुभव विश्वप्रार्थना म्हणणाऱ्याला ६ तास, ६ दिवस, ६ आठवड्यात किंवा जास्तीत जास्त ६ महिन्यात मिळतोच मिळतो. याची जीवनविद्या हमी देते. म्हणून रोज रात्री झोपण्याअगोदर १०८ वेळा विश्वप्रार्थना म्हणायची व रिकामपणी म्हणजे मनाने रिकामे असताना सतत म्हणायची. कमीतकमी १ हजार वेळा विश्वप्रार्थना रोज म्हंटली असता जीवनात संकटेच येत नाहीत किंवा आल्यास त्वरित सुटका होते. असा हजारो लोकांचा अनुभव आहे.
?सुखमे सुमिरन सभी करें, दुखमे करे ना कोय, जो सुखमे सुमिरन करे, तो दुख काहे को होय.? संत कबीर
इथे विश्वप्रार्थनेचे श्रेष्ठत्व सिध्द होते. इथे विश्वप्रार्थना म्हणणारा व ऐकणारा नकळत स्वउध्दार, समाज उध्दार आणि विश्व उध्दार करतो. तो जरी स्वत:साठीच प्रार्थना म्हणत असला तरी त्यात अनेकांचे हित साधले जाते. त्यामुळे अहंकाराचा प्रश्न इथे येत नाही. सामान्यपणे सामान्य माणूस संकटे आल्यावर देवाचा धावा करतो. पण जो विश्वप्रार्थना सतत म्हणतो त्या व्यक्तिवर संकटे येण्याचे प्रमाण अगदी कमी असते आणि तो लवकर त्या संकटातून सहीसलामत बाहेर पडतो कारण विश्वप्रार्थनेमुळे त्याच्या मनाला मजबुती आलेली असते. त्याच्यापाशी आत्मविश्वास निर्माण होतो. जीवनविद्या असे सांगते की, आपण नेहमी निसर्गनियमांशी सुसंगत जीवन जगले पाहिजे. त्याचप्रमाणे आपण सकारात्मक जीवनशैली अंगिकारली पाहिजे. विश्वप्रार्थना म्हंटल्याने वरील २ गोष्टी साध्य होतात. नामधारकांनी आपली संकटांतून सुटका विश्वप्रार्थना सतत म्हणून करून घेतली. पण काही लोकांचे असे म्हणणे आहे की, संकटांतून सुटका होण्यासाठी विश्वप्रार्थना म्हणणे हे अत्यावश्यक आहे कशावरून?
विचार, आचार, उच्चार म्हणजेच काया, वाचा, मने ह्या ३ स्तरांवर माणूस जे कार्य करत असतो. ते मनाद्वारा होते. Human life revolves around mind. म्हणजे थोडक्यात मन ह्या तत्त्वाभोवती जीवन फिरत असते. त्यामुळे मनाचे स्थैर्य, मनाची निकोपता, त्याची सुदृढता सुखी जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे. अडचणीतून, संकटातून, दु:खातून जर आपल्याला बाहेर पडायचे असेल तर मजबूत मनाची आवश्यकता असते. संकटाच्या वेळी आपले मन दुबळे होते. त्याला ठोस आधाराची गरज असते. तो ठोस आधार विश्वप्रार्थना आपल्याला देते. आपल्या जीवनात जी संकटे येतात त्यावेळेला आपल्याकडे पुण्याईचा ठणठणाट झालेला असतो. ज्याप्रमाणे भरपूर पैसा असलेल्या माणसाला आपण श्रीमंत म्हणतो, त्याचप्रमाणे पुण्य गाठीला असलेल्या माणसाला आपण पुण्यवंत म्हणतो. असा पुण्यवान माणूस जीवनात सुखी असतो कारण त्याच्या कुटुंबातील व सभोतालची माणसे सुस्वभावी व गुणी असतात. घरात आर्थिक सुबत्ता असते. निरोगी जीवन तो जगत असतो. थोडक्यात टेन्शन फ्री जीवन तो जगतो. जगातील अनेक सुखे आपण पैशाने विकत घेऊ शकतो. त्यामुळे माणसे पैशाच्याच मागे लागतात. पण मग पैसा मिळवायचा नाही का? तर त्याच उत्तर असे आहे की, योग्य मार्गाने पैसा मिळवायचा आणि पैशाबरोबर पुण्यसुध्दा मिळवले पाहिजे. पैशाच्या ठणठणाटामुळे जीवनात दु:ख सामोरे येते तर पुण्याईच्या ठणठणाटामुळे संकटांचा पूर येतो.
आपण त्याचबरोबर हेही लक्षात ठेवले पाहिजे की असे सुखी जीवन जगत असताना पुण्याई खर्च होत असते आणि ती जर भरून काढली नाही तर पुण्याईचा साठा संपत जातो व तो माणूस दु:खाच्या खाईत पडू शकतो. म्हणजेच सुखी जीवन जगण्यासाठी पुण्याईची आवश्यकता असते आणि ही पुण्याई त्या माणसाजवळ विश्वप्रार्थनेने मोठ्या प्रमाणावर साठवली जाते. वेगवेगळ्या प्रकारचे दान करून पुण्य मिळते. उदाहरणार्थ-अन्नदान, वस्त्रदान, द्वव्यदान, रक्तदान, नेत्रदान, देहदान वगैरे.. यातील काही दान प्रकार तात्कालिक असतात. ते दान परत परत करावे लागते आणि त्यात आणखी एक असा धोका असतो की घेणारा याचक (भिकारी) होऊन जातो. तो देणाऱ्याकडे परत परत हात पसरतो. दुसरा धोका असा आहे की, देणाऱ्यास जर देण्याचा ?अहंकार? झाला तर कापूर जसा अग्निच्या सहवासात आल्यावर आपले अस्तित्व गमावतो अगदी त्याचप्रमाणे देणारा आपली पुण्याई गमावतो. इथे विश्वप्रार्थनेचे श्रेष्ठत्व सिध्द होते. इथे विश्वप्रार्थना म्हणणारा व ऐकणारा नकळत स्वउध्दार, समाज उध्दार आणि विश्व उध्दार करतो. तो जरी स्वत:साठीच प्रार्थना म्हणत असला तरी त्यात अनेकांचे हित साधले जाते. त्यामुळे अहंकाराचा प्रश्न इथे येत नाही. सामान्यपणे सामान्य माणूस संकटे आल्यावर देवाचा धावा करतो. पण जो विश्वप्रार्थना सतत म्हणतो त्या व्यक्तिवर संकटे येण्याचे प्रमाण अगदी कमी असते आणि तो लवकर त्या संकटातून सहीसलामत बाहेर पडतो कारण विश्वप्रार्थनेमुळे त्याच्या मनाला मजबुती आलेली असते. त्याच्यापाशी आत्मविश्वास निर्माण होतो. जीवनविद्या असे सांगते की, आपण नेहमी निसर्गनियमांशी सुसंगत जीवन जगले पाहिजे. त्याचप्रमाणे आपण सकारात्मक जीवनशैली अंगिकारली पाहिजे. विश्वप्रार्थना म्हंटल्याने वरील २ गोष्टी साध्य होतात. विचार ही जीवनाची गंगोत्री आहे. जसा विचार तसा जीवनाला आकार, ?As you think so you become?. असे जर आहे तर सुविचारांचे चक्र सतत विश्वप्रार्थना रूपाने मनात फिरवत रहाणे हा सुखी जीवनाचा मार्ग आहे. या मागे मनाचे एक शास्त्र आहे. मन हळूहळू विचारांकडून आकाराकडे सरकत असते. हा मनाचा एक गुणधर्म आहे. ?Mind Moves from thought to thing.? कठिण परिस्थितीत अडकलेला माणूस मन:स्थिती तशीच ठेऊन परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतो. कठिण परिस्थिती बदलण्यासाठी तो हातपाय मारतो पण बुडत्याचा पाय खोलात या म्हणीप्रमाणे अडचणीरूपी गुंत्यामध्ये तो अधिकाधिक गुंतून जातो. पण ज्या वेळेला तो विश्वप्रार्थना मनात ठसविण्याचा प्रयत्न करू लागतो तेव्हा हळूहळू परिस्थितीत बदल होऊ लागतो. मनातील संकटांची भिती कमी होऊ लागते आणि ज्याप्रमाणे दह्याचे मंथन केले असता लोणी अलगद वर येते अगदी त्याचप्रमाणे विश्वप्रार्थना म्हणणारा माणूस अडचणीतून अलगद बाहेर पडतो.
आसमंतामध्ये माणसाने केलेल्या विचारांच्या विचारलहरी आहेत. आपण जे विचार करतो ते विचार सूक्ष्म रूपामध्ये आसमंतात वास करतात. विचार ही एक प्रचंड शक्ती आहे. पण हे विचार काळजी, चिंता, दु:ख, द्वेष, असूया, अपमान, बदला ह्यांचेच मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळेच विचार प्रदुषण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. सुविचार, शुभ विचार, मंगल विचार करणारी माणसे कमी आहेत. अनिष्ट विचारांचा दुष्परिणाम अखिल मानवजातीला भोगावा लागत आहे. विश्वप्रार्थना म्हणजे सुविचारांची खाण आहे. आसमंतामध्ये सुविचार आणि विधायक शक्ती जर निर्माण करायची असेल तर आज जास्तीत जास्त लोकांनी विश्वप्रार्थनारूपी विधायक शक्तिचा अवलंब करावा.
श्रीसद्गुरूचरणी वंदना बेल्हे
|